Maharashtra Border Issue Agrowon
ताज्या बातम्या

Maharashtra Border Issue : पन्नास वर्षानंतरही सरकारचे दुर्लक्षच!

राजकीय अनास्था आणि लोकप्रतिनिधींच्या असंवेदनशीलतेने जत तालुक्याच्या पूर्व भागातील ४२ गावे गेल्या अर्धशतकापासून पाण्यापासून वंचित आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील ४८ गावे कर्नाटकात येण्यास इच्छुक आहेत, असे विधान केले आणि राज्य सरकार आणि लोकप्रतिनिधींचे अस्तित्व, अस्मिता जागी झाली. प्रश्न पाण्याचा असला तरी, इथे मूलभूत सोयीसुविधांचा प्रश्‍न देखील उफाळून आला आहे. या साऱ्यांमुळे सीमेवरील लोकांचे जगणे अधिकच काटेरी आणि असह्य झाले आहे. याचा आजपासून ‘आंखो देखा, लेखाजोखा.’

अभिजीत डाके

सांगली : गेल्या ५० वर्षांपासून आम्ही पाण्यासाठी (Water) टाहो फोडतोय. आजपर्यंत मिळाली ती केवळ आश्वासने. कागदोपत्रीच म्हैसाळ योजना (Mahisal Water Scheme) आमच्या जत तालुक्याच्या पूर्व भागातील ४२ गावांत पोचली आहे. प्रत्यक्षात योजनेचे पाणी कधी मिळणार, असा प्रश्न आहे. त्यामुळे आमचं सीमेवरच (Maharashtra Border Issue) जगणं असह्य झालं आहे. तिसरी पिढी पाण्यासाठी आर्त करते आहे. आम्हाला पाणी मिळाले नाही, तर आम्ही कर्नाटकात जाणारच, अशी ठाम भूमिका आता इथल्या जनतेने घेतली आहे.

दुष्काळी भागातील पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी म्हैसाळ योजनेला अंदाजे १९७७ ला मंजुरी मिळाली. या योजनेत मिरज, कवठेमहांकाळ, जत आणि सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा आणि सांगोला या तालुक्यांचा समावेश केला होता. म्हैसाळ उपसा सिंचन योजनेची पायाभरणी सन १९८४ मध्ये झाली.

पुढे जत तालुक्यातील पूर्व भागापर्यंत पाणी देण्याचा मानस त्यावेळी नेत्यांनी मनाशी बाळगला होता. राज्यात १९९५ च्या दरम्यान, युतीचे शासन सत्तेवर आले आणि म्हैसाळ योजनेच्या पाचव्या टप्प्याला मंजुरी मिळाली. त्यानंतर कामही सुरु झाले. परंतु हे काम कासवाच्या गतीने होते.

दरम्यानच्या काळात जत तालुक्याच्या पूर्व भागात या योजनेचे पाणी येणार नसल्याचे समजले. त्यामुळे जत तालुक्यातील पूर्व भागात असणारी ४२ गावांना या पाण्यापासून वंचित ठेवले, असा आरोप इथले ग्रामस्थ करत आहेत.

तिथून सुरु झाला पाण्यासाठी लढा. उपोषण, आंदोलने, निवडणुकीवर बहिष्कार अशा पद्धतीने महाराष्ट्र सरकारवर दबाव टाकण्यास सुरवात झाली. तालुक्याच्या पूर्वभागात सिंचन योजना पूर्ण करण्यासाठी पाच दशकांपासून लढा देत आहोत. आम्ही दबाव टाकला की, ‘तुम्हाला पाणी देतो’ अशी आश्वासनांची खैरात सुरु झाली. परंतु या दबावाला सरकारने धुडकावून लावले.

आम्ही कुठे आणि कसे जगतो हे कुणालाच पडलेलं नाही. आम्ही महाराष्ट्राशी असलेलं नात तोडू शकत नाही. आमच्यावर सरकारने रडण्याची वेळ आणली आहे. आता आम्ही त्यांना लाथा मारुन उठवत आहोत. आता आम्ही तुम्हाला पाणी देतो, असे आश्वासन दिले आहे. जर मार्चअखेर पाणी दिले नाही तर, कर्नाटकात जाण्यास मुख्यमंत्र्यांची संमती आहे, असे समजू.

- मोहनराव गायकवाड, माजी सरपंच, सोरडी, ता. जत, जि. सांगली.

(क्रमशः)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Local Body Election: प्रचारात झालेल्या खर्चाची भरपाई द्या

Crop Loan: पीककर्ज वितरणाची गती मंदावली

Agriculture Technology: इक्रिसॅटचे तंत्रज्ञान कृषी विद्यापीठात राबवू

Rabi Crop Insurance: रब्बी हंगामातही पीकविम्याला प्रतिसाद कमीच

Sury Project Canal: सूर्या डावा तीर कालव्याच्या दर्जावर प्रश्‍नचिन्ह

SCROLL FOR NEXT