Fertilizer Agrowon
ताज्या बातम्या

Fertilizer : ‘एमओपी, ‘पीडीएम’च्या वापरात गफलत नको

बाजारात रासायनिक घटकांपासून तयार केलेले एमओपी, तसेच साखर कारखान्यांमधील उसाच्या मळीवर प्रक्रिया करून बनवलेले पीडीएम उपलब्ध आहे.

टीम ॲग्रोवन

पुणे ः राज्यात शेतीमधील पीक पोषण व्यवस्थापनात (Crop Nutrition Management) पालाशचा (Potash) वापर करताना ‘एमओपी’ (म्युरेट ऑफ पोटॅश) व ‘पीडीएम’ (पोटॅश डिराव्हड फ्रॉम मोलॅसिस) यामध्ये गफलत होत आहे. त्यामुळे कृषी विद्यापीठाच्या शिफारशींप्रमाणे (Recommendation Of Agriculture University) पालाशचा वापर योग्य प्रमाणात होत नसल्याचे कृषी विभागाला आढळून आले आहे.

बाजारात रासायनिक घटकांपासून तयार केलेले एमओपी, तसेच साखर कारखान्यांमधील उसाच्या मळीवर प्रक्रिया करून बनवलेले पीडीएम उपलब्ध आहे. दोन्ही खतांमधून पिकाला पालाश या मुख्य अन्नद्रव्याचा पुरवठा होतो. एमओपी साधारणतः मिठासारखे चूर्ण स्वरूपात दिसते. तसेच दाणेदार स्वरूपातदेखील विकले जाते. यात पालाशचे प्रमाण ६० टक्के आहे.

कृषी आयुक्तालयाच्या गुणनियंत्रण विभागाच्या म्हणण्यानुसार, बाजारातील ५० किलोच्या ‘एमओपी’च्या पिशवीतून ३० किलो पालाश पिकाला मिळत असते. मात्र ‘पीडीएम’मध्ये हेच प्रमाण १४.५० टक्के इतके आहे. त्यामुळे ५० किलोच्या पीडीएम पिशवीतून जवळपास ७.२५ टक्के पालाश पिकाला मिळू शकते. याचाच अर्थ पोटॅशची खरेदी करताना शेतकऱ्यांनी खताच्या पिशवीवरील पालाशचे मूळ प्रमाण किती याची खात्री केली पाहिजे.

‘एमओपी’ व ‘पीडीएम’ या दोन्ही खतांत मुख्य घटक पालाश असल्यामुळे गफलत होते. परंतु त्यामुळे कृषी विद्यापीठांच्या शिफारशींप्रमाणे पिकांना योग्य खत मिळत नाही. परिणामी, पिकांच्या वाढीवर व एकूण उत्पादनावरदेखील प्रतिकूल परिणाम होतो. त्यामुळे पालाशच्या प्रमाणाची माहिती घेऊन पिकांना खताची मात्रा द्यावी लागेल. ‘पीडीएम’मधून अवघे ७.२५ टक्के आणि ‘एमओपी’मधून ३० टक्के पालाश मिळणार असल्यास पिकाला नेमके किती खत हवे तसेच किंमत किती होते आहे. याचा हिशेब करावा लागेल. कृषी विभाग व बारामती ‘केव्हीके’ने त्यासाठी ‘कृषक अॅप’ तयार केले आहे. या अॅपचा वापर शेतकऱ्यांनी केल्यास प्रमाण बिनचूक काढता येते, असे कृषी विभागाचे म्हणणे आहे.

‘पालाशचा वापर अभ्यासूपणे व्हावा’

पिकांसाठी ‘एमओपी’ किंवा ‘पीडीएम’ या दोन्ही खतांमधून मिळणारे पालाश उपयुक्तच आहे. त्यामुळे पिकात शर्करा निर्मिती व खोडे मजबूत होण्यास मदत होते. पीक सशक्त होते व कीड-रोगापासून बचाव करण्याची नैसर्गिक ताकद वनस्पतीला मिळते. शेतीमालाची चव, रंग, तजेला व टिकवण क्षमता हे गुण वाढविण्यातदेखील पालाशचा सहभाग असतो. हवामान बदलामुळे पिकांवर येणारा जैविक व अजैविक स्वरूपाचा ताण सहन करण्याची क्षमता तयार करण्याचा पालाशचा वाटा मोठा आहे. त्यामुळे पालाशचा वापर अभ्यासूपणे झाला पाहिजे, असे गुणनियंत्रण विभागाचे म्हणणे आहे.

पालाश खताचा वापर करताना शेतकऱ्यांनी काळजी घ्यायला हवी. ६० टक्के प्रमाण असलेल्या ‘एमओपी’ची एक पिशवी शेतकरी वापरत असल्यास आणि त्याला पर्याय म्हणून पीडीएम वापरायचा असल्यास एक नव्हे, तर चार पिशव्या वापराव्या लागतील. त्यानंतरच कृषी विद्यापीठाने केलेल्या शिफारशीनुसार पिकाला खत मात्रा मिळेल.
दिलीप झेंडे, कृषी संचालक, निविष्ठा व गुणनियंत्रण विभाग

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soyabean Crop Damage: सोयाबीनवर कीटकनाशक फवारलं, सोयाबीन जळालं; केंद्रीय कृषिमंत्र्याचे कारवाईचे आदेश

Satara DCC Bank : सातारा जिल्हा बॅंकेची वार्षिक सभा खेळीमेळीत

Satara ZP Election : सातारा ‘झेडपी’साठी २६ लाख ६६ हजार मतदार

Rain Crop Damage : शेती पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा; मदत व पुनर्वसन मंत्री जाधव यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

Crop Loss Compensation : भरपाईप्रश्‍नी जिल्हाधिकारी करणार हस्तक्षेप

SCROLL FOR NEXT