Crop Insurance
Crop Insurance Agrowon
ताज्या बातम्या

Crop Insurance : पीकविमा कंपनीने तातडीने पंचनामे करावेत

टीम ॲग्रोवन

अकोला ः जिल्ह्यात अतिवृष्टी, (Heavy Rainfall) पुरामुळे पाणी साचल्याने तसेच सततच्या पावसामुळे पिकांचे अतोनात नुकसान (Crop Damage) झाले आहे. या वर्षी मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी पीकविमा (Crop Insurance) काढला आहे. याबाबत विमा कंपनीला सूचनाही दिल्या. परंतु विमा कंपनीचे कर्मचारी प्रत्यक्ष पाहणीसाठी टाळाटाळ करीत असतात.

हे लक्षात घेता पीकविमा कंपनीने तातडीने पंचनामे करावेत, अशी मागणी भारत कृषक समाजाने विमा कंपनीच्या जिल्हा व्यवस्थापकांकडे केली. कृषक समाजाचे महाराष्ट्र चेअरमन डॉ. प्रकाश मानकर व पदाधिकाऱ्यांनी विमा कंपनीचे व्यवस्थापक श्री. प्रभात यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले.

यंदाच्या हंगामात पाऊस व पुरामुळे शेतकऱ्यांचा खरीप हंगाम वाया गेल्यामुळे त्यांना रब्बी हंगामासाठी शेती तयार करावयाची आहे. परंतु पंचनामे होत नाही तोपर्यंत हे काम करता येत नाही.

तरी विमा कंपनीने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना रब्बीसाठी शेती तयार करू द्यावी, अन्यथा शेतकऱ्यांना रब्बीमध्येही उशीर झाला तर पिकांवर परिणाम होऊ शकतो. म्हणून विमा कंपनीने तातडीने सगळीकडे पंचनामे करावे,

अन्यथा वेळ झाल्यानंतर शेतकऱ्यांनी शेती तयार केली तर त्यास विमा कंपनी जबाबदार राहील, अशा आशयाचे निवेदन देण्यात आले. या वेळी रावसाहेब चिखलीकर, अरविंद पाटील, दिलीप पाटील, ज्ञानेश्‍वर आवारे आदी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage : पावसामुळे दोन हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

Katol APMC : उच्च न्यायालयाची पणनमंत्र्यांना नोटीस

Pesticide Use : कीडनाशकांच्या अतिवापराविषयी सर्वोच्च न्यायालयात याचिका

Crate Production : अमरावती जिल्हा झाला क्रेट उत्पादनाचे हब

Crop Damage : श्रीरामपूर, कोपरगाव तालुक्यांना वादळी पावसाचा तडाखा

SCROLL FOR NEXT