Shasan Aplya Dari Agrowon
ताज्या बातम्या

Shasan Aplya Dari : ‘शासन आपल्या दारी’वर शेतकऱ्यांची टीका

Team Agrowon

Nashik News : ‘शासन आपल्या दारी’या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार असे जवळपास ८ मंत्री शनिवारी (ता. १५) नाशिक जिल्हा दौऱ्यावर होते. या कार्यक्रमात शेती, सिंचन, उद्योग, महिला सक्षमीकरण या विषयावर जोरदार भाषणे झाली.

सरकार सर्वसामान्य माणूस व शेतकऱ्यांसोबत राहील, अशी गर्जना झाली. मात्र जिल्ह्यात आजवर झालेल्या घोषणांबाबत मौन दिसून आले. त्यामुळे सरकार दिलेला शब्द पाळत नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. शेतकऱ्यांच्या बाबतीत घोषणा जोरात; मदतीची कार्यवाही होत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला.

हे सरकार सर्वसामान्य शेतकऱ्यांचे आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मात्र त्यांनी राजकीय भूमिका मांडून विरोधकांचा शासकीय कार्यक्रमात समाचार घेण्यात धन्यता मानली; परंतु त्यांनीच केलेल्या घोषणेचा त्यांना विसर पडल्याचे दिसून आले. लेट खरीप कांद्याला ३५० रुपये प्रतिक्विंटल अनुदान देण्याचे जाहीर केले होते. मात्र आता खरीप हंगाम सुरू होऊनही ते मिळालेले नाही.

एप्रिलमध्ये झालेल्या अतिवृष्टीनंतर मुख्यमंत्री अयोध्येचा दौरा आटोपून तातडीने जिल्हा दौऱ्यावर आले. त्या वेळी पाहणीदरम्यान सटाणा तालुक्यातील शेतकऱ्यांना आठ दिवसांतच आपल्याला मदत मिळेल, असे आश्वस्त केले होते. मात्र याही घोषणेला तीन महिने उलटून गेले तरीही शेतकऱ्यांच्या पदरी काहीच पडले नाही. दिलेला शब्द सरकार पाळत नसल्याने शेतकऱ्यांत नाराजी आहे.

उपमुख्यमंत्री फडणवीस यांनीही दिवसा बारा तास वीज व सिंचन सुविधा बळकटीकरणाची घोषणा केली. शेतीविकासासाठी मूल्यवर्धनाला चालना देण्याचे अधोरेखित केले. तसेच उपमुख्यमंत्री पवार यांनीही जिल्हा बँकेच्या मुद्द्याला हात घालत आर्थिक नाडी सुरळीत करण्याचा शब्द दिला.

गरज पडल्यास पंतप्रधान मोदी यांची भेट घेऊन प्रश्न सोडवणार असेही जाहीर केले. गेल्या दीड महिन्यापासून उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्यांकडे राज्य सरकारने दुर्लक्ष केल्याने सरकार शब्द पाळणार का, असाही सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

शेतकऱ्यांनी व्यक्त केला संताप

  • फक्त घोषणा असतात. फोटोसेशन होते. सामान्य जनता, शेतकरी व शासन यांच्यामध्ये खूप मोठी दरी.

  • लोकांना बस करून ओढून ताणून आणले; शेतकऱ्यांना फक्त आश्वासन दिले.

  • अंमलबजावणी होत नाही, त्यामुळे सरकारवर आता विश्वास उरला नाही.

  • ‘शासन आपल्या दारी’ नाहीतर शेतकरी सरकारच्या दारातच उभा

  • शासन फक्त घोषणाबाजीपुरते आहे.

हा कार्यक्रम पूर्णपणे राजकीय असून प्रत्येक नेता आपली पाठ थोपटून वक्तव्य करत आहेत. रब्बीतील पिकांचे नुकसान झाल्यानंतर स्वतः मुख्यमंत्री पाहणी दौरा करून घेले. परंतु अजून मदत मिळालेली नाही.
-अभिमन पगार, उत्तर महाराष्ट्र प्रमुख-राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना.
नव्या घोषणांपेक्षा आधी केलेल्या घोषणांचे काय झाले? नुसते चॉकलेट दाखवायचे काम करू नका.
- भूषण कचवे, शेतकरी, दहिदी, ता. मालेगाव
कांदा अनुदान, पीक नुकसानीची मदत, पीकविमा याविषयी ठोस भूमिका ट्रिपल इंजिन सरकारने शेतकऱ्यांसमोर मांडणे अपेक्षित होते. मात्र पूर्ण निराशा झाली.
- ज्ञानेश्वर कांगुणे, शेतकरी, हिरापूर, ता. चांदवड
फक्त पोकळ आश्वासनांचा पाऊस. जनता, शेतकरी त्रस्त आहेत. सरकारचे शासकीय यंत्रणेवर लक्ष नाही. सरकार फक्त घोषणाबाज आहे.
- गजानन साळवे, शेतकरी, ताहराबाद, ता. सटाणा
यावर्षी पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. राज्य सरकारने तत्काळ सततच्या पावसाची मदत व कांदाअनुदान द्यावे.
- नंदकुमार उशीर, शेतकरी, धोडांबे, ता. चांदवड

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Village Development : एकात्मिक प्रयत्नांतून आर्थिक संपन्न गाव निर्मिती शक्य

Milk Production Issue : भ्रूण प्रत्यारोपित कालवडी वाटपाची घाई कशाला?

Artificial Intelligence : केंद्र सरकारकडून दिल्लीत ३ कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित सेंटर्स स्थापन करण्याची घोषणा

Crop Protection : पीक संरक्षणासाठी बीजप्रक्रिया महत्त्वाची

Hasan Mushrif : 'शक्तीपीठ' महामार्ग बाधित शेतकरी आक्रमक, मुश्रीफ यांच्या वाहनांचा ताफा अडविला

SCROLL FOR NEXT