Compensate orchard growers Agrowon
ताज्या बातम्या

फळबाग उत्पादकांना नुकसानभरपाई द्या

तिवसा तालुक्यातील शेतकऱ्यांची मागणी

Team Agrowon

तिवसा, अमरावती (Amaravati) तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे (Heavy rainfall) सोयाबीन, तूर, कापूस या पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यातच संत्राबागांचे प्रचंड नुकसान झाले. असे असताना सरकारकडून फळबाग उत्पादकांना वगळण्यात आले. त्यामुळे संताप व्यक्त केला जात असून नुकसानग्रस्तांमध्ये लिंबूवर्गीय पिकांचा समावेश करून नुकसानभरपाईची मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी तहसीलदार यांना निवेदनातून केली आहे.

जुलै व ऑगस्ट महिन्यात सर्वत्र मुसळधार पाऊस झाल्याने शेती आणि घरांचे प्रचंड नुकसान झाले, तर तालुक्यात लिंबूवर्गीय फळपीक व इतर फळ पिकांचे मोठे नुकसान असतानादेखील अनुदानामधून हे पीक समाविष्ट करण्यात आले नाही. प्रशासनाकडून याविषयी योग्य माहिती पुरविण्यात आली नसल्याने फळबाग उत्पादक शेतकरी या अनुदानापासून वंचित राहणार असल्याची भीती शेतकऱ्यांमध्ये आहे. त्यामुळे तालुक्यातील संत्रा उत्पादकांनी तहसील कार्यालयावर धडक देत अतिवृष्टीमध्ये फळबाग समाविष्ट करून नुकसानभरपाई देण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन दिले. यावेळी नगराध्यक्ष योगेश वानखडे, विक्रांत वानखडे, संजय चौधरी, अमित मेटकर, सतीश कडू, संजय राऊत, अतुल कळंबे, उमेश राऊत, राजेश चौधरी, गणेश कडू आदी शेतकरी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Crisis : १७ सप्टेंबरपासून संयुक्त किसान मोर्चा विदर्भ दौऱ्यावर; कापूस धोरण, टॅरिफ आणि आत्महत्यावर शेतकऱ्यांशी संवाद

Maharashtra Health Scheme: कॅन्सर, हृदयविकार, किडनी आजारांवर आता गरीबांसाठी सरकारकडून मिळणार १.५ लाखांपर्यंत मोफत आरोग्य सुविधा

Hingoli APMC Merger : हिंगोली, सिरसम कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे एकत्रीकरण

krushi Sakhi : कृषी सखींना लवकर मिळणार थकित मानधन

Manoj Jarange Patil: १७ सप्टेंबरच्या आत कुणबी प्रमाणपत्र द्या; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा!

SCROLL FOR NEXT