K Chandrashekhar Rao
K Chandrashekhar Rao Agrowon
ताज्या बातम्या

BRS Rally : भारत राष्ट्र समितीची छत्रपती संभाजीनगरला सभा

Team Agrowon

Chhatrapati Sambhaji Nagar तेलंगणातून मराठवाडा मार्गे महाराष्ट्रात प्रवेश करणाऱ्या ‘बीआरएस’ अर्थात भारत राष्ट्र समितीची आज (ता. २४) छत्रपती संभाजीनगरमधील जबिंदा मैदानावर सभा होत आहे.

मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगरमधील या सभेला ‘बीआरएस’चे राष्ट्रीय अध्यक्ष व तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव मार्गदर्शन करतील. तेलंगणात ४५० योजना कशाप्रकारे राबविल्या जातात, यावर ते बोलतील.

याचवेळी मराठवाड्यातील शेतकरी चळवळीतील तसेच विविध राजकीय पक्षातील आजी-माजी नेते पदाधिकारी मिळून किमान २५० ते ३०० कार्यकर्ते ‘बीआरएस’मध्ये जाहीर प्रवेश करतील, असे पक्षातर्फे सांगण्यात आले आहे.

शेतकरी आणि गोरगरिबांसाठी तेलंगणामध्ये ज्या कल्याणकारी योजना तेलंगणा सरकार परिणामकारकरीत्या राबविते आहे. त्या योजना महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांना राबविणे का शक्य नाही, असा सवाल करीत ‘अबकी बार किसान सरकार' चा नारा ‘बीआरएस’ने दिला आहे.

आज होणाऱ्या सभेसाठी गत आठवडाभरापासून तेलंगणातील प्रमुख नेते छत्रपती संभाजीनगरमध्ये तळ ठोकून आहेत. शिवाय मराठवाड्यात जोडल्या गेलेल्या नेत्यांच्या माध्यमातून लोकांपर्यंत आपली भूमिका पोचविण्याचा प्रयत्न पक्षाच्या माध्यमातून केला जात आहे, अशी माहिती ‘बीआरएस’चे प्रवेश केलेले शेतकरी नेते शंकर अण्णा धोंडगे यांनी दिली. ही सभा अभूतपूर्व होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Rain : वादळी पावसाने टोमॅटो, मिरची, भेंडीसह ऊस पीक उद्धवस्त, नुकसान भरपाई मिळणार कधी?

Konkan Ranmeva : कोकणच्या रानमेव्यावर वातावरणाचा परिणाम, अनेकांचे आर्थिक गणित कोलमडणार

Agrowon Podcast : हळदीचे भाव तेजीतच; कापूस, सोयाबीन, गहू, लिंबू यांचे काय आहेत दर पाहुयात?

Ethanol Production : कांदा उत्पादकांच्या पाठोपाठ ऊस उत्पादकांनाही सरकारनं घोषणा करून भूलवलं ? | शेतीच्या बातम्या

Maharashtra Rain : राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा; देशातील अनेक भागात तापमानाचा पारा ४२ ते ४६ अंशाच्या दरम्यान

SCROLL FOR NEXT