Water Scheme  Agrowon
ताज्या बातम्या

Jal Jeewan Mission : जलजीवन मिशनची गाडी सुसाट

शहापूर, मुरबाड, कल्याण, भिवंडी आणि अंबरनाथ या पाच तालुक्यातील जनतेला स्वच्छ आणि शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे. तसेच गावातील महिलांचा त्रास कमी व्हावा, यासाठी केंद्रामार्फत जलजीवन मिशन ही योजना राबविण्यात येत आहे.

टीम ॲग्रोवन

ठाणे : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील महिलांना पाण्यासाठी डोक्यावर हंडा घेऊन मैलोन् मैल पायपीट करावी लागत आहे. त्यांच्या डोक्यावरील हंड्याचे ओझे कमी करण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जलजीवन मिशनअंतर्गत (Jal Jeewan Mission Scheme) विविध योजना राबविण्यात येत आहेत.

या योजनेचे काम मागील काही महिन्यांपासून सुरुवातीला संथगतीने सुरू होते. मात्र, आता पुन्हा या योजनेला गती प्राप्त झाली असून ७८७ योजनांपैकी ७८७ कामांच्या निविदा काढल्या असून ५७५ योजनांचे कार्यादेश देण्यात आले असून लवकरच या कामांना प्रत्यक्षात सुरुवात होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या सूत्रांनी दिली.

शहापूर, मुरबाड, कल्याण, भिवंडी आणि अंबरनाथ या पाच तालुक्यातील जनतेला स्वच्छ आणि शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे. तसेच गावातील महिलांचा त्रास कमी व्हावा, यासाठी केंद्रामार्फत जलजीवन मिशन ही योजना राबविण्यात येत आहे. गाव-पाड्यांमधील महिलांना तसेच पुरुषांना पाण्यासाठी पायपीट करत विहीर तसेच हातपंपावर जाऊन डोक्यावर हंडे घेऊन पाणी आणावे लागत होते.

मात्र या योजनेच्या माध्यमातून पाच तालुक्यांमध्ये ७८७ योजना जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या वतीने हाती घेतल्या आहेत. सुरुवातीला या योजनांचा वेग मंदावला असल्याचे दिसून येत आले. कामांचा वेग वाढावा, यासाठी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सूचना देत गती प्राप्त करून दिली आहे.

घराघरांत पाणी पोहोचणार

उन्हाळ्यात विहिरीसह अन्‍य जल स्रोतांमधील पाण्याची पातळी खालावते. त्यामुळे पाण्याची समस्या भेडसावते. पण जलजीवन मिशनच्‍या माध्‍यमातून धरणातून व अन्य जलस्रोतांच्या माध्यमातून आता प्रत्‍येक घराघरांत पाणी पोहोचणार आहे.

माणशी ५५ लिटर पाणी

७८७ योजनांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून निविदा काढल्या आहेत. तसेच ५७५ योजनांचे कार्यादेश देण्यात आले असून लवकरच या कामांना प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. प्रत्येक घराला नळ जोडणी आणि माणशी ५५ लिटर पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.

जलजीवन मिशनची अंमलबजावणी आणि नियोजनाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मार्च २०२४ अखेरपर्यंत याचे नियोजन पूर्ण करण्याचे सरकारचे निर्देश आहेत. त्यानुसार, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग काम करत आहे. प्रत्येक घराला नळ जोडणी आणि माणशी ५५ लिटर पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.
अर्जुन गोळे, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग
जलजीवन मिशनची अंमलबजावणी आणि नियोजनाचे काम युद्धपातळीवर सुरू व्हावे, यासाठी वॉररूम तयार करण्यात आला. त्यामुळे एकाच छताखाली सर्व योजनांची कामे मार्गी लागण्यास मदत झाली. येत्या महिन्याच्या अखेरपर्यंत संपूर्ण योजनांची निविदा प्रक्रिया पूर्ण करून कार्यादेश देण्यासाठी प्रयत्नशील आहोत.
मनुज जिंदल, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, ठाणे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT