Nursery Agrowon
ताज्या बातम्या

Nursery Business : भाजीपाला रोपांच्या मागणीत ८० टक्के घट

अभिजित डाके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Sangli News : जिल्ह्यात मे महिन्यात शेतकरी भाजीपाला लागवड करतात. मात्र, यंदा मॉन्सूनपूर्व पावसाने दडी मारली. पावसाची रोहिणी आणि मृग नक्षत्रही कोरडे गेले आहेत. याचा नकारात्मक परिणाम भाजीपाला लागवडीवर झाला आहे. परिणामी ८० टक्के रोपांच्या मागणीत घट झाली आहे. शेतकरी पावसाची प्रतीक्षा करत असून पाऊस लांबणीवर पडला तर यंदा भाजीपाल्याच्या लागवडीत लक्षणीय घट होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

जिल्ह्यात भाजीपाल्याचे क्षेत्र सुमारे दहा हजार हेक्टरपेक्षा अधिक आहे. प्रत्येक हंगामात वांगी, ढोबळी मिरची, काकडी, कारली यापिकासह भाजीपाला पीक लागवडीचे शेतकरी नियोजन करत असतात. श्रावण, गणपती, दसरा या सणाला भाजीपाल्याची मागणी अधिक असते आणि दरही चांगले मिळतात. त्यामुळे शेतकरी थोड्या थोड्या क्षेत्रावर भाजीपाल्याचे उत्पादन घेऊन ते विक्रीचे काटेकोर नियोजन करतात.

मे महिन्यात भाजीपाला लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांनी एप्रिल महिन्यात लागवड पूर्व मशागती उरकल्या आहेत. एप्रिल महिन्यात उन्हाळी पाऊस पडतो. त्यामुळे भाजीपाला लागवडीसाठी याचा फायदा होतो.

त्यानुसार लागवडीचे नियोजन करण्यास प्रारंभ होतो. दरवर्षीप्रमाणे रोपवाटिकामध्ये भाजीपाल्यांची रोपे निर्मितीला गती असते. रोपांची मागणीही शेतकऱ्यांकडून नोंदवली जाते. त्यानुसार रोपांची निर्मिती केली जाते. गेल्यावर्षीही जून महिना संपला तरी पाऊस नव्हता. त्यादरम्यानही रोपांच्या मागणी घट झाली होती.

यंदाही गतवर्षीसारखीच परिस्थिती निर्माण झाली आहे. लागवडीसाठी शेत तयार असून पाऊस नसल्याने तयार झालेली रोपे शेतकऱ्यांनी विकत घेतलेली नाहीत. त्यामुळे ही रोपे विक्री करण्यासाठी रोपवाटिका मालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

फेब्रुवारी, मार्च महिन्यात भाजीपाला लागवड केली आहे, त्या पिकांना पाण्याची टंचाई असल्याने अडचणी वाढल्या आहेत. त्यातच कृष्णा आणि वारणा नदीवर उपसा बंदी घातली आहे. त्यामुळे पाणी देणे मुश्कील बनत चालली आहे.

पावसाची दडी आणि पाण्याची कमतरता असल्याने भाजीपाला पीक धोक्यात आले असल्याचे दिसते आहे. पावसाची रोहिणी नक्षत्र पूर्ण कोरडा गेला. तर मृग नक्षत्रात पाऊस सुरू होते. जून महिना निम्मा संपला तरी पावसाने हजेरी लावली नसल्याने भाजीपाल्याच्या रोपांच्या मागणीत सुमारे ८० टक्के घट झाली आहे.

जूनच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. परंतु शेवटच्या आठवड्यात वेळेत पाऊस झाला नाही तर, जुलै महिन्यातही भाजीपाला पिकांची लागवड करण्यासाठी शेतकरी पाठ फिरवतील, असा अंदाज व्यक्त होत आहे.

मॉन्सूनपूर्व पावसाने दडी मारली आहे. त्यातच पाण्याची टंचाई आणि लांबलेला पाऊस यामुळे रोपांच्या मागणीत मोठी घट झाली आहे. अगोदर केलेल्या लागवडीसाठी पाणी कमतरता भासू लागली आहे. त्यामुळे शेतकरी लागवडीसाठी पुढे येत नाहीत.
- प्रकाश कदम, प्रविराम कृषी परिवार
भाजीपाला लागवडीसाठी शेत तयार केले आहे. एक एकर ढोबळी मिरची, कारले, दोडका असे नियोजन केले आहे. परंतु पाऊस लांबणीवर पडला आहे. त्यातच पाण्याची कमतरता आहे. त्यामुळे पावसाची प्रतीक्षा करत असून पाऊस झाल्यावरच लागवड करणार आहे.
- संभाजी माने, भाजीपाला उत्पादक, बहादुरवाडी, ता. वाळवा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Village Development : एकात्मिक प्रयत्नांतून आर्थिक संपन्न गाव निर्मिती शक्य

Milk Production Issue : भ्रूण प्रत्यारोपित कालवडी वाटपाची घाई कशाला?

Artificial Intelligence : केंद्र सरकारकडून दिल्लीत ३ कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित सेंटर्स स्थापन करण्याची घोषणा

Crop Protection : पीक संरक्षणासाठी बीजप्रक्रिया महत्त्वाची

Hasan Mushrif : 'शक्तीपीठ' महामार्ग बाधित शेतकरी आक्रमक, मुश्रीफ यांच्या वाहनांचा ताफा अडविला

SCROLL FOR NEXT