Soil Ploughing : ट्रॅक्टरने जमीन नांगरताना कोणती काळजी घ्याल?

Soil Management : वाढती मजुरी, मजुरांची कमतरता तसेच वेळेआभावी शेतकरी जमीन ट्रॅक्टरने नांगरण्याला प्राधान्य देतात. पिकाची काढणी झाल्याबरोबर ज्या जमिनी नांगरता येत नाहीत, त्या वाळून कठीण बनतात. जमिनी वळवाच्या पावसानंतर अगर पावसाळ्यातील पहिल्या पावसानंतर नांगरतात. अशा जमिनी भुसभुशीत होण्यासाठी ट्रॅक्टरने नांगरल्या जातात.
Soil Ploughing
Soil PloughingAgrowon
Published on
Updated on

Soil Mechanization : वाढती मजुरी, मजुरांची कमतरता तसेच वेळेआभावी शेतकरी जमीन ट्रॅक्टरने नांगरण्याला प्राधान्य देतात. पिकाची काढणी झाल्याबरोबर ज्या जमिनी नांगरता येत नाहीत, त्या वाळून कठीण बनतात. जमिनी वळवाच्या पावसानंतर अगर पावसाळ्यातील पहिल्या पावसानंतर नांगरतात. अशा जमिनी भुसभुशीत होण्यासाठी ट्रॅक्टरने नांगरल्या जातात.

नांगरटीमुळे लहान-मोठी ढेकळे निघतात, जमिनीचा पृष्ठभाग सपाट राहत नाही आणि मग पेरणी करण्यापूर्वी तिची अनेक प्रकारच्या अवजारांनी मशागत करावी लागते. उन्हाने नांगरटीत निघालेली ढेकळे ठिसूळ होतात आणि ती नंतर औताने फोडणे सोपे जाते.नांगरट झालेल्या जमिनीत पिकाची भरपूर प्रमाणात वाढ होऊन जमिनीत मुळे खोलवर पसरतात.

दर वर्षी नांगरट केल्यामुळे काही ठरावीक खोलीवर कठीण थर निर्माण होतो. त्यामुळे पाण्याचा योग्य निचरा होत नाही. हा तयार झालेला कठीण थर सब सॉयलर नांगराने फोडावा लागतो. नांगरट उताराला आडवी केल्याने वळवाच्या पावसाचे पाणी अडवले जाते, जमिनीत मुरते. नांगरटीमुळे निचरा न होणाऱ्या भारी, चिकण आणि रेताड जमिनीत नायट्रोजन आणि पोटॅशिअम यांचे प्रमाण वाढण्यास मदत होते.

Soil Ploughing
Animal Care : जनावरांतील कृत्रिम रेतन यशस्वी होण्यासाठी कोणती काळजी घ्याल?

ट्रॅक्टरने जमीन नांगरताना घ्यायची काळजी

१) पुढच्या आणि मागच्या चाकातील अंतर समान असावे.

२) वापरात असलेली साधने जसे फाळ, हा जमिनीशी ९० अंशांत काम करणारा असावा.

३) साधा व पलटी केल्यानंतर समान खोलीवर जमिनीत चालला पाहिजे.

४) पाळ्या घालताना वापरात असलेली पट्टी समान खोलीवरील मातीत चालली पाहिजे.

५) सर्व जागी असलेले नट व बोल्ट घट्ट असावेत.

७) ट्रॅक्टर हळू चालवूनच चांगली नांगरट शक्य आहे. काम संपण्याची घाई म्हणून जोरात चालवू नये.

८) नांगरटीत पूर्व पिकांचे सर्व शिल्लक अवशेष पूर्ण गाडले जाणे जरुरीचे आहे.

९) नांगरटीच्या वेळी जमिनीत जर कमी प्रमाणात ओल असेल तर मातीचे कण एकमेकांना जास्त शक्तींनी धरून ठेवतात. याचा परिणाम नांगरटीनंतर मोठमोठी ढेकळे तयार होतात. या ऐवजी मातीत जास्त पाणी असेल तर चिखलणी होते. फाळाबरोबर वर येणारी माती चिकट दिसू लागते. या स्थितीत पुढे पाणी प्रमाण कमी झाल्यावर जास्त घट्टपणा येतो. मुळांना वाढीच्या काळात खोल जाण्यास अडथळा येतो.

१०) सतत एकाच खोलीवर नांगरट केल्यास जमिनीखाली एक कठीण थर तयार होतो. जो पाण्याला खालच्या थरात जाऊ देत नाही. याच कारणासाठी दोन वर्षांतून एकदा सबसॉयलरचा वापर करणे आवश्यक आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com