
Soil Fertility : सेंद्रिय खतामध्ये कर्बाचे प्रमाण जवळपास ६० टक्के असतं. हा सेंद्रिय कर्ब जमिनीच्या वरच्या थरात असतो. जमिनीतील सुक्ष्मजीव हे सेंद्रिय घटकांमध्ये असलेली सर्व मूलद्रव्ये पिंकांच्या मुळांना उपलब्ध करून देत असतात. ज्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाच प्रमाण हे एक टक्क्यापेक्षाही कमी असत ती जमीन शेतीसाठी योग्य मानली जात नाही. तर जमिनीमधील सेंद्रिय कर्ब जेव्हा चार टक्के किंवा त्यापेक्षा जास्त असतो, तेव्हा जमिनीची सुपीकता चांगली असते. पिकाच्या वाढीसाठी आवश्यक असणारी मूलद्रव्ये चांगल्या कुजलेल्या सेंद्रिय खतामधून सहज उपलब्ध होतात.
सेंद्रिय कर्बाचे फायदे
सेंद्रिय कर्बामुळे जमिनीतील सूक्ष्मजीवांच प्रमाण वाढत. कारण जमिनीतील सूक्ष्मजीव हे कर्बावर आपली उपजीविका करत असतात. हे कर्ब त्यांना जमिनीतील अन्नद्रव्ये, पालापाचोळा, मृत वनस्पती आणि प्राणी यांच्या विघटनातून मिळते. याच बरोबर विघटनामधून सूक्ष्मजीव वनस्पतीसाठी आवश्यक मूलद्रव्ये देखील जमिनीमध्ये उपलब्ध करून देतात. अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेसाठी वनस्पती जमिनीतील सूक्ष्म जिवांवर अवलंबून असतात.
जमिनीतील सूक्ष्मजीव वाढल्यामुळे जमिनीतील खनिज द्रव्यांचं स्थिरीकरण वाढत. जमिनीतील अन्नद्रव्यांची धारणक्षमता वाढून त्यांना एकत्रित बांधून ठेवत.
जमिनीतील अन्नद्रव्यांची स्थिरता वाढल्यामुळे जमिनीची विद्युत वाहकता सुधारते. त्यामुळे जमिनीचा सामू सुधारण्यासही मदत होते.
जमिनीतील कर्बाचं प्रमाण वाढण्यासाठी जमिनीमध्ये
मिसळले जातात. या सेंद्रिय पदार्थांचे विघटन झाल्यानंतर ह्युमस आणि ह्युमिक ॲसिड तयार होतं. ह्यूमस जमिनीची सुपीकता वाढविते. त्यामुळे जमिनीचा पोत सुधारण्यास मदत करते.
ह्युमसचे प्रमाण वाढल्यामुळे जमिनीमध्ये हवेची पोकळी वाढते. या पोकळीमुळे मुळांच्या वाढीसाठी पोषक वातावरण तयार होत.
जमिनीचा पोत सुधारल्यामुळे जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमताही वाढते. जमिनीमधील कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण वाढतं. त्यामुळे पिकाची चांगली वाढ होते. पाण्याचा निचरा होऊन जमिनीची धूप कमी होण्यास मदत होते.
आपण जी पिकाला रासायनिक खते देतो त्या खतांची उपलब्धता वाढून या खतांचा ऱ्हास कमी होतो. अशा प्रकारे या सर्व गोष्टी एकमेंकांवर अवलंबून आहेत. त्यामुळे आपल्या शेतीत रासायनिक खतांचा वापर कमी करुन सेंद्रिय खतांचा वापर वाढवण अत्यंत गरजेच आहे.
सुपीक जमिनीमध्ये निसर्गाची निरोगी अन्नसाखळी अखंडित चालू असते. पण जेव्हा रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा अमर्याद वापर होतो तेव्हा ही अन्नसाखळी तुटते आणि जमिनीमधील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमी होऊ लागत. त्यामुळे सेंद्रिय कर्ब महत्वाचा मानला जातो.
---------------
माहिती आणि संशोधन - महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.