
महाराष्ट्रात आवळ्याच्या फळांचा हंगाम हा प्रामुख्याने सप्टेंबर ते डिसेंबर अखेरपर्यंत असतो. कोकणात मात्र आवळ्याला वर्षातून दोन वेळा फळे येतात. बाजारपेठेत आवळ्याची आवक जास्त झाली की दर एकदम कोसळतात आणि कौडीमोल भावाने आवळ्याची विक्री करावी लागते. अशा अत्यंत गुणकारी परंतु दुर्लक्षीत आवळ्याच्या फळापासून विविध मूल्यवर्धित (Amla Processing) पदार्थ तयार केल्यास निश्चितपणे फायदा होईल.आवळ्यापासून तयार केलेल्या मूल्यवर्धित पदार्थांना बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात मागणी असते. आवळ्यापासून आवळा कॅन्डी, (Amla Candy) मोरावळा, रस किंवा सरबत, लोणचे तसेच सुपारी असे मूल्यवर्धित पदार्थ तयार करता येतात.
आवळ्यापासून कॅंन्डी तयार करण्यासाठी मध्यम आकाराची निरोगी फळे निवडावीत. ही फळे आठ ते दहा मिनिटे २ ते २.५ टक्के मीठ व तुरटीच्या उकळत्या द्रावणात मलमलच्या कापडात बांधून धरावीत. फळे थंड झाल्यावर हाताने त्याच्या पाकळ्या फोडून बिया व फोडी वेगळ्या कराव्यात.
या पाकळ्या पहिल्या दिवशी ५० टक्के तीव्रतेच्या पाकात २४ तास ठेवाव्यात. दुसऱ्या दिवशी पाकातून फोडी काढून घेऊन पाकात साखर मिसळून पाकाची तीव्रता ६० टक्के करावी. यामध्ये पाक थोडासा गरम करावा व थंड झाल्यावर फोडी टाकून त्या २४ तास ठेवाव्यात.
तिसऱ्या दिवशी पाकातून फोडी काढून पाकात साखर मिसळून त्याची तीव्रता ७० % करावी. पाक थंड झाल्यावर त्यामध्ये फोडी मिसळून २४ तास ठेवावे नंतर सलग तीन दिवस पाकाची तीव्रता ६८ % च्या वर राहील याची काळजी घ्यावी. नंतर पाकविलेल्या फोडी काढून पाक नितळून ठेवून फोडी तीन-चार दिवस सावलीत फॅन खाली सुकवाव्यात.
पूर्ण सुकविलेला फोडींनाच कॅण्डी असे म्हणतात. कॅन्डी वजन करून पॉलिथिनच्या पिशवीत भरून पिशव्या हवा बंद करून थंड आणि कोरड्या जागी साठवून ठेवाव्यात. तयार झालेली कॅंडी वर्षभर चांगली टिकते.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.