Water Level : गिरणासह इतर सिंचन प्रकल्पांतील जलसाठा घटू लागला

Water Shortage : खानदेशात विविध सिंचन प्रकल्पांमधील जलसाठ्यात घट होत असून, चाळीसगाव (जि. जळगाव) नजीकच्या गिरणा धरणातील जलसाठा मागील १० ते १२ दिवसांत सुमारे नऊ टक्क्यांनी घटला आहे.
Water Level
Water LevelAgrowon
Published on
Updated on

Jalgaon News : खानदेशात विविध सिंचन प्रकल्पांमधील जलसाठ्यात घट होत असून, चाळीसगाव (जि. जळगाव) नजीकच्या गिरणा धरणातील जलसाठा मागील १० ते १२ दिवसांत सुमारे नऊ टक्क्यांनी घटला आहे.

गिरणा धरण २०१९ ते २०२२ या चार वर्षांत १०० टक्के भरले होते. या धरणावर गिरणा पट्टा किंवा निम्मा जळगाव जिल्हा अवलंबून आहे. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, एरंडोल, धरणगाव या तालुक्यांतील २१ हजार हेक्टर क्षेत्रास या धरणातून रब्बीसंबंधी पाणी दिले जाते.

तसेच चाळीसगाव, भडगाव, पाचोरा या शहरांस सुमारे १०० गावांमधील पिण्याच्या पाण्यासाठी या धरणातील जलसाठा उपयोगात येतो. हे धरण नाशिक जिल्ह्यातील नांदगावात आहे. परंतु त्याचा सर्वाधिक उपयोग जळगावला आहे. त्याची साठवणक्षमता १८ टीएमसी एवढी आहे. यंदा हे धरण फक्त ५६ टक्के एवढे भरले होते.

Water Level
Hatnur Water Level : हतनूरमधील जलसाठ्यात झपाट्याने घट

त्यातील पाणी यंदा पिण्यासह धुळ्यातील उद्योगांसाठी राखीव करण्यात आले. रब्बीसाठी पाणी या धरणातून न मिळाल्याने गिरणा पट्टा संकटात आहे. यातच या धरणातून झपाट्याने पाण्याची उचल सुरू आहे. मागील १० ते १२ दिवसांत धरणातील जलसाठा सुमारे नऊ टक्क्यांनी घटला आहे. त्यात आता सुमारे ४१ टक्के एवढाच जलसाठा आहे. या धरणातून जामदा बंधाऱ्यात उद्योगांसाठी मध्यंतरी पाणी सोडण्यात आले होते.

तसेच काही शहरे व गावांच्या पाणी योजनांचे स्रोत बळकट करण्यासाठी नदीतही पाणी सोडण्यात आले होते. यामुळे धरणातील जलसाठा घटला आहे. नदीत कानळदा (ता. जळगाव) या गावापर्यंत पाणी सोडण्यात आले होते. कानळदा गाव नदीच्या अखेरच्या भागात आहे. आणखी नदीत तीन वेळेस पाणी सोडले जाईल. जूनपर्यंत हे तीन आवर्तने सोडले जातील.

Water Level
Water Level : परभणी जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पात १९ टक्के पाणीसाठा

धुळ्यातील सोनवद, अमरावती, बुराई, मालनगाव या प्रकल्पांतही यंदा अल्प जलसाठा होता. धुळ्यातील फक्त अनेर (शिरपूर) व पांझरा (साक्री) हे प्रकल्प १०० टक्के भरले होते. यामुळे धुळे जिल्ह्यातील एकूण जलसाठाही ४० टक्क्यांपर्यंतच असल्याची माहिती आहे.

नंदुरबारात दरा, देहली व तापी नदीवरील प्रकाशा आणि सारंगखेडा बॅरेजमध्ये १०० टक्के जलसाठा होता. यामुळे जिल्ह्यातील स्थिती बरी आहे. परंतु नंदुरबार, नवापूर, शहादा तालुक्याचा पूर्व भागात जलसंकट तयार होत आहे.

हतनूरमध्येही कमी जलसाठा

गिरणा ५६ टक्के भरल्याने त्यातील जलसाठा कमी दिसत आहे. परंतु तापी नदीवरील भुसावळ (जि. जळगाव) नजीकच्या हतनूर धरणात ५४ टक्के गाळ आहे. हे धरण दरवर्षी १०० टक्के भरते. परंतु त्यात गाळ अधिक असल्याने जलसाठा कमी असतो. या धरणातूनही पाण्याची मोठी उचल केली जाते.

भुसावळातील आयुध निर्माणी, दीपनगर औष्णिक वीजप्रकल्प, भुसावळ शहर, जळगावातील औद्योगिक वसाहतीतही या धरणातून पाणी दिले जाते. शिवाय यावल, रावेर व चोपड्यातील सुमारे नऊ हजार हेक्टर क्षेत्रातील रब्बीलाही पाणी दिले जात आहे. यामुळे यातील जलसाठा आता ६४ टक्क्यांवर आला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com