Hatnur Water Level : हतनूरमधील जलसाठ्यात झपाट्याने घट

Water Shortage : हतनूर धरणात यंदाही १०० टक्क जलसाठा होता. परंतु पाण्याची वेगवान उचल आणि अधिकचा गाळ यामुळे या प्रकल्पातील जलसाठाही झपाट्याने कमी होत आहे.
Hatnur Dam
Hatnur DamAgrowon

Jalgaon News : खानदेशात तापी नदीला दुष्काळी स्थितीतही पूर येतो. अर्थात, तापी नदीवरील भुसावळनजीकच्या (जि. जळगाव) हतनूर धरणात यंदाही १०० टक्क जलसाठा होता. परंतु पाण्याची वेगवान उचल आणि अधिकचा गाळ यामुळे या प्रकल्पातील जलसाठाही झपाट्याने कमी होत आहे.

हतनूर धरणात सध्या ६३ टक्क्यांवर जलसाठा आहे. या प्रकल्पाची साठवण क्षमता सुमारे नऊ टीएमसी एवढी आहे. परंतु या प्रकल्पात ५४ टक्के गाळ आहे. गाळामुळे जलसाठा कमी होत आहे. तसेच हतनूरमधून यावल, रावेर व चोपडा या भागातील रब्बीसाठी दोन वेळेस आवर्तन देण्यात आले आहे.

Hatnur Dam
Adani Project : ‘पाटगाव’मधून एक थेंबही पाणी अदानी वीज प्रकल्पास देणार नाही

या प्रकल्पातून भुसावळ येथील आयुध निर्माणी व दीपनगर येथील औष्णिक विद्युत केंद्रासही पाणी दिले जाते. जळगाव येथील औद्योगिक वसाहत आणि भुसावळ शहरासही या प्रकल्पातून पाणी दिले जाते. यामुळे प्रकल्पातील जलसाठा झपाट्याने कमी झाला आहे.

सुमारे सात हजार हेक्टर क्षेत्रातील रब्बीस या प्रकल्पामुळे आधार होतो. प्रकल्प १०० टक्के भरल्यानंतर त्यातून अनेक दिवस विसर्ग सुरू होता. एकदा महापूरदेखील तापी नदीस आला. पावसाळ्यात सर्वाधिक दिवस ही नदी प्रवाही असते. परंतु हतनूरमधील गाळ ही मोठी समस्या आहे.

Hatnur Dam
Marathwada Water Crisis : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांत झपाट्याने घट

पाण्याची उचल व पुढे उष्णता वाढल्यानंतर हतनूरमधील जलसाठा आणखी कमी होईल. तो एप्रिलमध्येच अल्प स्थितीत येऊ शकतो, अशीही भीती आहे. भुसावळ शहरासही पाण्याची मोठी गरज असते. यामुळे भुसावळला पुढे टंचाईचा सामना करावा लागेल, अशीही भीती आहे.

‘गिरणा’त फक्त पिण्यासाठीच पाणी

गिरणा नदीवरील चाळीसगावजीकच्या (जि. जळगाव) गिरणा धरणात यंदा ५६ टक्के जलसाठा होता. हा जलसाठा सध्या ४० टक्क्यांवर आहे. यंदा जलसाठा कमी असल्याने गिरणातून रब्बीसाठी पाणी देण्यात आलेले नाही. सुमारे २१ हजार हेक्टर क्षेत्राला गिरणा धरणातील पाण्याचा लाभ होतो. परंतु एवढे क्षेत्र यंदा भिजलेले नसल्याने रब्बी गिरणा पट्ट्यात कमी आहे.

गिरणा धरणातून नाशिकमधील मनमाड, जळगावातील चाळीसगाव, भडगाव व पाचोरा या शहरांनाही पाणी दिले जाते. तसेच धुळे जिल्ह्यातील उद्योगासाठी देखील पाणी दिले जाते. तसेच गिरणा नदीत सुमारे १०० गावांची टंचाई दूर करण्यासाठी पाच वेळेस पाणी सोडले जाणार आहे. एकदा पाणी सोडण्यात आले असून, जळगाव तालुक्यातील कानळदापर्यंत हे पाणी सोडले जात आहे, अशी माहिती मिळाली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com