Girna Dam : गिरणा धरणातील साठा ५७ टक्के

Dam Water Storage : खानदेशात सर्वांत मोठ्या धरणांत गणल्या जाणाऱ्या नांदगाव (जि. नाशिक) येथील गिरणा नदीवरील गिरणा धरणातील जलसाठा ५६.७० टक्के एवढा शनिवारी (ता. ३०) सकाळी नोंदविण्यात आला आहे.
Girna Dam
Girna DamAgrowon
Published on
Updated on

Jalgaon News : खानदेशात सर्वांत मोठ्या धरणांत गणल्या जाणाऱ्या नांदगाव (जि. नाशिक) येथील गिरणा नदीवरील गिरणा धरणातील जलसाठा ५६.७० टक्के एवढा शनिवारी (ता. ३०) सकाळी नोंदविण्यात आला आहे. धरणातील जलसाठा बऱ्यापैकी झाल्याने शेतकऱ्यांना रब्बीसाठी पाणी मिळणार आहे.

गिरणा धरण भौगोलिकदृष्ट्या नाशिक जिल्ह्यात आहे. पण त्याचा नाशकातील फक्त मालेगावला काहीसा उपयोग होतो. गिरणा धरणाची साठवण क्षमता १८.५० टीएमसी आहे. सर्वाधिक लाभ जळगाव जिल्ह्यास आहे. जिल्ह्यातील चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, एरंडोल, धरणगाव या तालुक्यांतील सुमारे २१ हजार हेक्टर क्षेत्रास या धरणातून रब्बीसाठी पाणी मिळते.

Girna Dam
Girna Dam : गिरणा धरणातील आवक वाढू लागली

जळगाव जिल्ह्यातील १०० पेक्षा अधिक गावे आणि चाळीसगाव, पाचोरा, भडगाव या शहरांनाही पाणीपुरवठा केला जातो. नाशिकमधील मनमाड शहरासाठी देखील या धरणातून जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा केला जातो. या धरणात मागील चार वर्षे सलग १०० टक्के जलसाठा झाला आहे.

Girna Dam
Girna Dam : ‘गिरणा’त ३७, वाघूरमध्ये ५६ टक्के जलसाठा

यंदा मात्र धरणाच्या पाणलोट क्षेत्रात कमी पाऊस झाल्याने जलसाठा वाढलेला नाही. मागील वर्षी ऑगस्टमध्येच गिरणा धरण १०० टक्के भरले होते. परंतु यंदा त्यात पावसाळ्याचा अधिकृत कालावधी संपला तरीदेखील ६० टक्के जलसाठा झालेला नाही.

परंतु धरणात ५७ टक्के जलसाठा असल्याने रब्बीला तीन वेळेस आवर्तन मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे. याबाबत अंतिम निर्णय कावसा समितीच्या बैठकीत लवकरच होईल. ही बैठक पुढील पंधरवड्यात होईल, असे संकेत मिळत आहेत. पालकमंत्री ही बैठक घेऊन जलसंपदा विभागाला त्याची माहिती दिली जाईल.

वाघूर धरणही १०० टक्के भरले

सातमाळा, अजिंठा डोंगरातून येणाऱ्या वाघूर नदीवरील जामनेर (जि. जळगाव) येथील वाघूर धरणातही १०० टक्के जलसाठा झाला आहे. जळगाव व जामनेर शहर आणि उद्योगांना या धरणातून पाणी दिले जाते. तसेच जळगाव व भुसावळातील सुमारे २१०० हेक्टर क्षेत्रास रब्बीसाठी तीन वेळेस आवर्तन दिले जाते. या धरणातून विसर्ग सुरू आहे.

विसर्ग सुरू

खानदेशात सध्या तापी नदीवरील भुसावळ (जि. जळगाव) नजीकच्या हतनूर धरणातूनही विसर्ग सुरू आहे. तसेच तापी नदीवरील धुळ्यातील सुलवाडे (ता. शिरपूर), नंदुरबारातील सारंगखेडा (ता. शहादा), प्रकाशा (ता. शहादा) या बॅरेज किंवा मध्यम प्रकल्पांतूनही पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com