Girna Dam : ‘गिरणा’त ३७, वाघूरमध्ये ५६ टक्के जलसाठा

Girna Dam Water Level : वाघूर धरणाचे लाभक्षेत्र छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अजिंठा डोंगररांगा व पाचोरा भागात आहे. परंतु या भागातही जोरदार पाऊस झालेला नाही.
Girna Dam
Girna DamAgrowon
Published on
Updated on

अॅग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News : खानदेशात अनेक प्रकल्पांत जलसाठा कमीच आहे. एकूण जलसाठा ४० टक्क्यांवरही नाही. जळगाव जिल्ह्यात गिरणा नदीवरील नांदगाव (जि. नाशिक) येथील गिरणा धरण ३७ टक्के  व वाघूर नदीवरील जामनेरनजीकचे (जि. जळगाव) वाघूर धरण ५६ टक्के भरले आहे. 

गिरणा पट्टा, धुळे, नंदुरबार भागात कमी पाऊस आहे. कमी पावसामुळे प्रकल्प भरलेले नाहीत. मागील चार वर्षे गिरणा धरण १०० टक्के भरले आहे. परंतु यंदा  हलका ते मध्यम पाऊस झाला. यामुळे प्रकल्पांत जलसाठा वाढला नाही. गिरणा धरणाच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, एरंडोल, धरणगाव या भागात २१ हजार हेक्टरवरील रब्बीला सिंचनासाठी पाणी उपलब्ध होते.

तसेच १०० गावांपेक्षा अधिक गावांना पाणी योजनांसाठी गिरणेतील पाण्याचा आधार असतो.  वाघूर धरणाचे लाभक्षेत्र छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अजिंठा डोंगररांगा व पाचोरा भागात आहे. परंतु या भागातही जोरदार पाऊस झालेला नाही. महिनाभर फक्त पावसाची रिपरिप सुरू होती. सातपुडालगत चांगला पाऊस झाला आहे. यामुळे या भागातील अनेक प्रकल्प १०० टक्के भरले आहे. त्यात जळगाव जिल्ह्यात रावेरातील अभोडा, मंगरूळ, सुकी, यावलमधील गारबर्डी, मोर हे प्रकल्प १०० टक्के भरले. नंदुरबारमधील देहली व दरा प्रकल्पदेखील १०० टक्के भरले आहेत. 

Girna Dam
Maharashtra Dam Water Update : राज्यातील धरणाच्या पाणी पातळी वाढली का?

सुसरी प्रकल्पातही जलसाठा बऱ्यापैकी आहे. धुळ्यातील पांझरा व शिरपुरातील अनेर प्रकल्पाची स्थिती समाधानकारक आहे. पांझरा प्रकल्प मागील काही दिवसांपूर्वीच १०० टक्के भरला आहे. परंतु धुळ्यातील बुराई, अमरावती, सोनवद आदी प्रकल्प तळ गाठत आहेत. शिंदखेडा तालुक्यातही कमी पाऊस असल्याने अनेक प्रकल्पांत ठणठणाट आहे. 

जळगाव जिल्ह्यात पश्चिम भागात जलसाठे कमी आहेत. त्यात जामनेरातील तोंडापूर, पाचोऱ्यातील बहुळा, अग्नावती, चाळीसगावमधील मन्याड, एरंडोलातील अंजनी, पारोळ्यातील बोरी, भोकरबारी या प्रकल्पांतील जलसाठा चिंताजनक स्थितीत आहे. मन्याड प्रकल्पात फक्त सहा टक्के जलसाठा आहे.

हतनूरमध्ये रेलचेल

तापी नदीवरील भुसावळनजीकच्या हतनूर येथील (जि.जळगाव) धरणातून मागील महिनाभरापासून विसर्ग सुरू आहे. हा विसर्ग मागील आठ ते १० दिवसात सतत कमी झाला आहे. परंतु त्यातून विसर्ग सुरूच आहे. विदर्भातील पूर्णा व सातपुड्यातील अनेक नद्या तापीला येवून मिळतात. तापीचे उगमक्षेत्र असलेल्या बैतुल भागातही चांगला पाऊस मध्यंतरी झाला. यामुळे हतनूर धरणात सतत पाण्याची आवक सुरू होती. यामुळे प्रकल्पातून सतत विसर्ग सुरू आहे. सध्या प्रकल्पाच्या कालव्यासह नदीतही पाणी सोडले जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com