
Jalgaon News : खानदेशात या महिन्यात काही भागात पाणीटंचाई जाणवू लागली असून, परंतु टंचाईची तीव्रता कमी आहे. जलसाठे मुबलक असल्याने टंचाईवर यंदा मात करणे शक्य आहे.
सध्या सातपुड्यातील काही भागांत टंचाई आहे. तीव्र उताराच्या डोंगराळ भागात पाणी थांबत नाही. या भागात पाणी थांबत नसल्याने भूगर्भातही जलसाठा नाही. त्यात ऊन तापत आहे.
यामुळे सातपुड्यातील काही पाड्यांवर टंचाई दिसत आहे. पण तीव्रता फारशी नाही. हातपंपाद्वारे या भागात पाणी उपलब्ध होत आहे. टँकरची मागणी सध्या आलेली नसल्याची स्थिती आहे.
गिरणा, तापी, वाघूर, पांझरा प्रकल्पाचे पाणी नदीत सोडण्यात आले होते. गिरणा धरणातून अलीकडेच नदीत पाणी सोडण्यात आले असून, याद्वारे टंचाई दूर करण्यास मदत होते व सार्वजनिक पाणी योजनांचे जलस्त्रोत टिकविण्यास लाभ होतो.
धुळ्यातील साक्री, नंदुरबारमधील अक्कलकुवा, धडगाव, जळगावीत यावल, चोपडा व रावेर भागातील काही पाड्यांत सातपुड्यात टंचाई असल्याची माहिती आहे. ती दूर करण्यासाठी तात्पुरती कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे. गिरणा नदीतूनही तीन वेळेस नदीत पाणी सोडण्यात येणार आहे. यात नदीतून दोन वेळेस नदीत पाणी सोडले आहे.
खानदेशात सातपुड्यात चांगला पाऊस होता. नंदुरबार व धुळ्यात पावसाची टक्केवारी सरासरीपेक्षा अधिक आहे. धुळ्यात वर्षभरात ५६५ मिलिमीटर पाऊस पडतो. नंदुरबारमध्ये ८५४ मिलिमीटर दर जळगाव जिल्ह्यात ६३२ मिलिमीटर पाऊसमान आहे. यापेक्षा अधिकचा पाऊस सर्वत्र झाला. जळगाव जिल्ह्यातही सुमारे १३२ टक्के पाऊस झाला.
पण काही भागांत गावे, पाड्यांवर पाणीटंचाई जाणवू लागली आहे. कारण पर्वतातील पाणी नाले, नद्यांतून वाहून जाते. यामुळे सिंचनासह पिण्यासंबंधी पाण्याची समस्या तयार होऊ लागली आहे.
नंदुरबारमधील काही गावांत सध्या टंचाई असून टँकरची गरज मात्र नाही. धुळ्यातही सुमारे चार गावांत टंचाई आहे. जळगाव जिल्ह्यातही पाच गावांत टंचाईची स्थिती आहे.
जळगाव जिल्ह्यात चाळीसगाव, धुळ्यातील साक्री, शिंदखेडा व नंदुरबारमधील नंदुरबार तालुक्यात काहीशी समस्या असणार आहे. अनेक ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक बदलले जात आहे. पाणी वाचविण्यासाठी एक दिवसाआड पाणी देण्याचा निर्णय काही ग्रामपंचायतींनी घेतला आहे.
जलसाठा मुबलक, पण घट
जळगावसह धुळे, नंदुरबारमधील सर्वच प्रकल्पांतील जलसाठाही मुबलक आहे. जळगावमधील वाघूर, हतनूर व गिरणा धरणातील साठा मागील काही दिवसांत कमी झाला आहे. पण खानदेशातील एकूण जलसाठा ६८ टक्क्यांवर आहे.
यंदा जळगावातील हतनूर, गिरणा, वाघूर, सुकी, अभोडा, मंगरूळ, तोंडापूर, मन्याड, अंजनी, धुळ्यात पांझरा, अनेर, जाखेली, मालनगाव, अमरावती, बुराई, नंदुरबारमधील दरा, देहली, चिरडे आदी प्रकल्प १०० टक्के भरले होते. तसेच लघुतलाव, लघू प्रकल्पांतही जलसाठा १०० टक्के होता. यामुळे जलसाठा मुबलक आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.