Water Scarcity : पुणे जिल्ह्यात पाण्यासाठी भटकंती

Water Crisis : सध्या जिल्ह्यातील ८१ गावे आणि ५३३ वाड्यांवरील तब्बल एक लाख ६४ हजार २५ नागरिकांना १०८ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
Water Scarcity
Water Scarcity Agrowon

Pune News : उन्हाची तीव्रता वाढत असून, परिणामी पिण्याच्या पाण्याचे स्रोत आटत चालले आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.

सध्या जिल्ह्यातील ८१ गावे आणि ५३३ वाड्यांवरील तब्बल एक लाख ६४ हजार २५ नागरिकांना १०८ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. सर्वाधिक पाणीटंचाई पुरंदर तालुक्यात भेडसावत असून आतापर्यंत ३१ विहिरी अधिग्रहित केल्या आहेत.

एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा प्रकर्षाने अधिक जाणवू लागल्या आहेत. सध्या खासगी ९९ टँकर तर शासकीय ९ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. जिल्ह्यातील पुरंदर व बारामती भागात पाणीटंचाई अधिक गंभीर होऊ लागली आहे.

पुरंदरमध्ये ३३ गावे व २३२ वाड्यावस्त्यांना ५१ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. या टँकरद्वारे ६६ हजार ५०२ नागरिकांची तहान भागविली जात आहे. बारामतीमध्ये २० गावे व १२९ वाड्यावस्त्यांवरील ३१ हजार ६८७ नागरिकांना २१ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

Water Scarcity
Water Scarcity : जुन्नर तालुक्यात नऊ टँकरने पाणीपुरवठा

मागील वर्षी मॉन्सूनचे आगमन उशिराने झाले होते. मात्र, अधूनमधून पडत असलेल्या दमदार पावसामुळे जिल्ह्यातील जवळपास सर्वच धरणे १०० टक्के भरली होती. परंतु परतीचा पाऊसही समाधानकारक झाला नाही. पूर्व भागात पावसाचे प्रमाण कमी होते. त्यामुळे या भागात सर्व भिस्त टँकरवर अवलंबून होती.

पावसाळ्यातही टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली होती. प्रामुख्याने पुरंदरमधील राजुरी, रिसे पिसे या गावात पावसाळ्यात टँकरने पाणीपुरवठा सुरू होता. आता मात्र पाणीटंचाईची समस्या अधिक निर्माण होऊ लागली आहे. त्यामुळे नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. मे आणि जूनमध्ये टँकरच्या संख्येत वाढ होऊन पाणीटंचाई अधिक भासण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Water Scarcity
Water Scarcity : शिंदखेड्यात ७५ टक्के गावांमध्ये टंचाई

गेल्या वर्षी याच काळात पाण्याची फारशी अडचण आली नव्हती. त्यामुळे जिल्ह्यात एकही टँकर सुरू झालेला नव्हता. गेल्या वर्षीच्या तुलनेत चालू वर्षी टँकरच्या संख्येत चांगलीच वाढ झालेली दिसून येत आहे. गेल्या आठवड्यात टँकरची संख्या शंभरीच्या आत होती. सध्या जिल्ह्यात टँकरची संख्या हळूहळू वाढत असून शासकीय, खासगी टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. हा पाणीपुरवठा पुरंदर, बारामती, आंबेगाव, दौंड, हवेली, इंदापूर, जुन्नर, शिरूर भागांतील गावांमध्ये सुरू आहे. इतर भागातही पाणीटंचाई भेडसावण्याची शक्यता आहे.

३१ विहिरी अधिग्रहित

जिल्ह्यातील ८१ गावे आणि ५३३ वाड्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी ३१ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. त्यामध्ये आंबेगाव तालुक्यातील १०, बारामती २, हवेली १, पुरंदर ९, शिरूरमधील ९ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. तर बारामतीमध्ये एका बोअरवेलचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

तालुकानिहाय टँकरची संख्या :

तालुका --- टँकरची संख्या

आंबेगाव --- १०

बारामती --- २१

दौंड ---- ६

हवेली --- ४

इंदापूर --- १

जुन्नर --- ५

पुरंदर --- ५१

शिरूर --- १०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com