Agriculture Irrigation : विविध सिंचन प्रकल्पांतून पाण्याचा विसर्ग वाढला

Irrigation Projects Update : मागील आठवड्यातील जोरदार पावसाने खानदेशातील विविध सिंचन प्रकल्पांतील पाण्याची आवक वाढली आहे. यामुळे त्यातून पाण्याचा विसर्ग वाढला आहे.
Irrigation Project
Irrigation ProjectAgrowon
Published on
Updated on

Jalgaon News : मागील आठवड्यातील जोरदार पावसाने खानदेशातील विविध सिंचन प्रकल्पांतील पाण्याची आवक वाढली आहे. यामुळे त्यातून पाण्याचा विसर्ग वाढला आहे. खानदेशात मागील आठवड्यात अनेक भागांत जोरदार ते अतिजोरदार पाऊस झाला. दोन ते तीन तास सलग पाऊस झाला. यामुळे शेतांतील सखल भागात पाणीच पाणी झाले. नद्या, नाल्यांनाही पूर आला.

जळगाव जिल्ह्यात तापी नदीवरील भुसावळनजीकच्या हतनूर प्रकल्पात पाण्याची आवक वाढली. यामुळे या प्रकल्पातून विसर्ग वाढविण्यात आला. पुढे तापी नदीवरील जळगावातील शेळगाव बॅरेज, धुळ्यातील सुलवाडे बॅरेज, नंदुरबारमधील सारंगखेडा व प्रकाशा बॅरेजमधूनही विसर्ग सुरू करण्यात आला.

Irrigation Project
Irrigation Scheme : सिंचन योजनांची १३२ कोटींची कर्जमाफी

जळगावातील अग्नावती, अंजनी, तोंडापूर, वाघूर, बोरी या मध्यम प्रकल्पांतूनही विसर्ग सुरू करण्यात आला. खानदेशातील सर्वांत मोठ्या गिरणा नदीवरील चाळीसगावनजीकच्या गिरणा धरणातही पाण्याची आवक वाढली. नागासाक्या व अन्य सिंचन प्रकल्पांतून गिरणा धरणात पाण्याचा प्रवाह वाढला. यामुळे गिरणा धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आले. मध्यंतरी धरणात पाण्याची आवक बंद झाली होती. यामुळे त्यातून विसर्ग बंद करण्यात आला होता. परंतु यंदा तिसऱ्यांदा या प्रकल्पातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. गिरणा धरणाच्या पाण्याद्वारे चाळीसगावातील मन्याड, एरंडोलातील अंजनी, पारोळ्यातील बोरी, कंकराज आदी प्रकल्पांचे पुनर्भरण करण्यात आले आहे.

Irrigation Project
Rain Update : वीस धरणांतून विसर्ग सुरू

धुळ्यातील पांझरा, जामखेली या प्रकल्पांतूनही विसर्ग सुरू आहे. तसेच शिरपुरातील अनेर, नंदुरबारात सुसरी, चिरडे, दरा, देहली या प्रकल्पांतही पाण्याची आवक वाढली. यामुळे त्यातूनही विसर्ग काहीसा वाढला आहे. सिंचन प्रकल्पांतून पाण्याचा विसर्ग वाढल्याने नद्याही प्रवाही आहेत.

त्यात पाचोऱ्यातील अग्नावती प्रकल्पातून विसर्ग वाढल्याने पाचोऱ्यातील नगरदेवळा भागात अनेक घरांत पाणी शिरले. अग्नावती नदीने पात्र सोडले. याचा फटका काही गावांना बसल्याची माहिती मिळाली. जळगावातील वाघूर, तापी, कांग, वाघूर, अंजनी, गिरणा, भोकर, सुकी आदी नद्या प्रवाही आहेत. तसेच धुळ्यातील अनेर, पांझरा, नंदुरबारमधील सुसरी, गोमाई नदीसही प्रवाही पाणी आहे.

जलसाठा मुबलक, वापर अल्प

खानदेशात सप्टेंबरमध्ये अनेक प्रकल्प भरले. जळगावातील सुकी, अभोडा, मंगरूळ, गिरणा, तोंडापूर, मोर, अग्नावती, बोरी, अंजनी, धुळ्यातील पांझरा, जोमखेली, मालनगाव, बुराई, अमरावती, नंदुरबारमधील चिरडे, दरा, देहली, सुसरी आदी प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. यंदा जलसाठा मुबलक आहे. त्यातील वापरही अल्प आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com