
Sangli News : कवठेमहांकाळ तालुक्यातील अकरा तलावांतील पाणीसाठा कमी होत चालला आहे. तालुक्यातील अग्रणी नदी ठणठणीत कोरडी पडली असल्याने नदीकाठावरील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. त्यामुळे म्हैसाळ योजनेचे पाणी अग्रणी नदीत सोडावे अशी मागणी शेतकरी करू लागले आहे.
रब्बी हंगामासाठी म्हैसाळ सिंचन योजनेचे आवर्तन सुरू करावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली होती. त्यानुसार म्हैसाळचे आवर्तन सुरू केले आहे. सध्या म्हैसाळ सिंचन योजनेचे पाणी सुरू होऊन जत तालुक्यात पोहोचले आहे.
कवठेमहांकाळ तालुक्यातील नदीकाठावरील मळणगाव, बोरगाव, शिरढोण, तिरमलवाडी, देशिंग, मोरगाव, हिंगणगाव, विठुरायाचीवाडी, अग्रण धुळगाव, रांजणीचा काही पश्चिमेचा भाग व सीमाभागातील लोणारवाडीपर्यंत असलेल्या हजारो एकर शेतीला उन्हाळ्यात पाणीटंचाई भासल्यास पिके धोक्यात येणार आहेत.
उन्हाळी पिके, ऊस खोडव्यासह नवीन लागवडीस पाणी कमी पडत आहे. त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण आहे. म्हैसाळ योजनेचे पाणी ‘अग्रणी’त तत्काळ सोडावे.
तालुक्यातील ११ तलावांत पाणीसाठा दिवसेंदिवस खालावत असून पाणीटंचाई भासणार आहे. ‘म्हैसाळ’चे पाणी त्वरित सोडून तलाव भरल्यास तलावानजीकच्या शेतकऱ्यांना उन्हाळी पिके घेण्यासाठी लाभदायी ठरेल.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.