
Raigad News : उन्हाची वाढती तीव्रता, पिण्यासाठी आणि सिंचनासाठी होणारा पाण्याच्या वापरामुळे रायगड जिल्ह्यातील धरणांमध्ये केवळ २९ टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. पाटबंधारे विभागाच्या २८ धरणांपैकी सात धरणांनी तळ गाठल्याने पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
जुलैमध्ये पडणाऱ्या मुसळधार पावसात बहुसंख्य धरणे तुडुंब भरतात, तर काही ओसंडून वाहू लागतात; परंतु एप्रिल व मेमध्ये तीव्र उन्हाळा व पाण्याची मागणी वाढल्याने धरणातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस घटते. यातील काही धरणांतील पाण्याचा वापर सिंचनासाठीही केला जातो; मात्र शेती व भाजीपाल्याला पुरेसा पाणीपुरवठा उपलब्ध न झाल्यास शेतकऱ्यांनादेखील याचे नुकसान सोसावे लागणार आहे.
रायगड जिल्ह्यामध्ये श्रीवर्धन, पनवेल व खालापूर तालुक्यात तीन धरणे, सुधागड तालुक्यात पाच धरणे, महाडमध्ये चार धरणे, म्हसळा व कर्जत तालुक्यात दोन धरणे आहेत, तर अलिबाग, पेण, मुरूड, तळा, रोहा व उरण तालुक्यात प्रत्येकी एक धरण आहे.
या धरणातील पाण्यावर आजूबाजूच्या गावांमधील नळ पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत. काही धरणांमधील पाणी थेट जलवाहिनीद्वारे पुरवठा केले जाते, तर काही ठिकाणी धरणातील पाणी नदीत सोडले जाते.
नदीकाठच्या वीटभट्ट्यांमध्येही पाण्याचा मुबलक वापर केला जातो. महाड तालुक्यातील कोतुर्डे धरणामध्ये केवळ पाच टक्के पाणी शिल्लक आहे. या धरणातून महाड शहराला पुरवठा होत असून साठा कमी झाल्याने शहरामध्ये पाणीकपात करण्यात आली आहे. धरणातील मृत साठ्यांना मशीन लावून त्यातील पाणी खेचून शहराला पाणीपुरवठा केला जात आहे.
अत्यल्प पाणी असलेली धरणे (साठा टक्केवारीत)
महाड - कोतुर्डे ५
अलिबाग - श्रीगाव ११
सुधागड - ढोकशेत ५
सुधागड - उन्हेरे ८
सुधागड - घोटवडे १३
श्रीवर्धन - रानिवली ७
पनवेल - मोर्बे ९
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.