
Parbhani News : जिल्ह्यात तापमानात वाढ झाली आहे.बाष्पीभवनाचा वेग वाढला आहे. परिणामी लघु तलाव तसेच मध्यम प्रकल्पांतील जलसाठा झपाट्याने संपुष्टात येत आहे. जिल्ह्यातील ६ लघु तलाव कोरडे पडले आहेत. या जलस्त्रोतांवर पाणीपुरवठ्यासाठी अवलंबून असलेल्या वाड्या, वस्त्यांवरील पाणी टंचाई दाहकता वाढली आहे.
जायकवाडी पाटबंधारे विभागातर्फे गुरुवारी (ता. १७) घेतलेल्या नोंदीनुसार जिल्ह्यातील दोन मध्यम प्रकल्पांमध्ये सरासरी १५.५४ दलघमीनुसार ३० टक्के तर लघु प्रकल्पांमध्ये सरासरी ६.१३२ दलघमीनुसार १५ टक्के जलसाठा उपलब्ध होता. जायकवाडी पाटबंधारे विभागाअंतर्गत परभणी जिल्ह्यातील २१ व जालना जिल्ह्यातील लघु सिंचन प्रकल्पांची पूर्ण जल क्षमता सरासरी ४५.८२७ दलघमी तर उपयुक्त जलसाठा क्षमता ४२.२०५ दलघमी आहे.
गुरुवारी (ता. १७) घेण्यात आलेल्या पाणी पातळीच्या नोंदीनुसार जिंतूर तालुक्यातील जोगवाडा, बेलखेडा, चारठाणा, चिंचोली, आडगाव, केहाळ हे ६ लघु तलाव कोरडे पडले आहेत. पेडगाव (ता. परभणी), देवगाव (ता. जिंतूर), आंबेगाव (ता. मानवत), टाकळगाव, कोद्री (ता. गंगाखेड) या ५ लघू तलावातील जलसाठा जोत्याखाली गेला आहे.
जिंतूर तालुक्यातील वडाळी लघु प्रकल्पांमध्ये २५टक्के, भोसी लघु प्रकल्पामध्ये १७ टक्के, कवड लघु प्रकल्पामध्ये ६ टक्के,मांडवी लघु प्रकल्पामध्ये ५ टक्के, दहेगाव लघु प्रकल्पामध्ये १८ टक्के,पाडाळी (जि. जालना) लघु प्रकल्पामध्ये १९ टक्के जलसाठा होता.
झरी (ता.पाथरी) लघु तलावामध्ये ६६ टक्के,नखातवाडी (ता. सोनपेठ) लघु प्रकल्पांमध्ये ३ टक्के, तांदुळवाडी (ता. पालम) लघु प्रकल्पांमध्ये १२ टक्के, राणीसावरगाव (ता. गंगाखेड) लघु प्रकल्पामध्ये २५टक्के, पिंपळदरी (ता. गंगाखेड) लघु प्रकल्पांमध्ये ४९ टक्के जलसाठा होता. २०२४ मध्ये १७ एप्रिल रोजी लघु प्रकल्पांमध्ये सरासरी २.३८६ दलघमी (६ टक्के) जलसाठा होता.सात लघु प्रकल्प कोरडे पडले होते तर १० लघु प्रकल्पांतील पाणीसाठा जोत्याखाली गेला होता.
मध्यम प्रकल्पात ३० टक्के पाणीसाठा...
करपरा मध्यम प्रकल्पाची पूर्ण जल क्षमता २८.८२० दलमघी असून त्यापैकी उपयुक्त साठा क्षमता २४.९०० दलघमी आहे. मासोळी मध्यम प्रकल्पाची पूर्ण जल क्षमता ३४.०८५ दलघमी असून त्यापैकी उपयुक्त साठा २७.१४१ दलघमी आहे.जायकवाडी पाटबंधारे विभागातर्फे गुरुवारी (ता. १७) घेतलेल्या नोंदीनुसार करपरा प्रकल्पात ५.६९३ दलघमी नुसार २३ टक्के तर मासोळी धरणामध्ये ९.८४८ दलघमी नुसार ३६ टक्के उपयुक्त जलसाठा होता.
दोन्ही मध्यम प्रकल्पांमध्ये सरासरी १५.५४ दलघमीनुसार ३० टक्के जलसाठा होता.२०२४ च्या १७ एप्रिल रोजी करपरा मध्यम प्रकल्पांत ०.५८७ दलघमी (२ टक्के) जलसाठा होता तर मासोळी मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा जोत्याखाली गेला होता.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.