

Jalgaon News : खानदेशात यंदा रब्बी हंगामातील पिकांची पेरणी वाढताना दिसत आहे. यातच विविध धरणे, प्रकल्पांच्या लाभक्षेत्रातही शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. पण गिरणा, वाघूरच्या पाण्याची प्रतीक्षा कायम आहे. गिरणा धरणातून यंदा शेतीसाठी पाणी उपलब्ध होणार आहे.
तसेच इतर मध्यम प्रकल्पांतून पाणी मिळणार आहे. त्यासाठी पाण्यासाठी अर्ज मागविण्यात आले होते. ही प्रक्रिया काही प्रकल्पांच्या कार्यालयातर्फे राबविली जात आहे. पण ही प्रक्रिया पूर्ण करून शेतांपर्यंत पाणी देण्याची मागणी केली जात आहे. रब्बीसाठी गिरणा, वाघूर, हतनूर, धुळ्यातील पांझरा,
अनेर आदी प्रमुख प्रकल्पांमधून पाणी दिले जाणार आहे. त्यासाठी पाणी मागणीचे अर्ज गेल्या महिन्यात मागविण्यात आले होते. तसेच मागील थकबाकीबाबतही सूचना देण्यात आल्या. अर्ज प्रक्रिया काही प्रकल्पांनी पूर्ण केली.
परंतु काही प्रकल्पांतर्फे ही प्रक्रिया राबविण्याची कार्यवाही सुरूच आहे. रब्बीसाठी पहिले आवर्तन काही प्रकल्पांमधून मिळालेले नाही. त्यात गिरणा, वाघूर प्रकल्पांचा समावेश आहे. तसेच पांझरा प्रकल्पातूनही सर्वांना पाणी मिळालेले नसल्याची माहिती आहे.
तापी नदीवरील भुसावळनजीकच्या हतनूरच्या मदतीने रावेर, यावल, चोपडा भागातील सुमारे ११ हजार हेक्टरला पाणी उपलब्ध होते. तर वाघूर धरणातून भुसावळ, जळगाव तालुक्यातील सुमारे अडीच हजार हेक्टर क्षेत्राला लाभ होतो. हरभरा, ज्वारी पिकाला पाणी आवश्यक असून पाण्याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे.
गिरणा धरणाच्या लाभक्षेत्रात ज्वारी, हरभरा व गव्हाची पेरणी झाली आहे. तीन वेळेस धरणातून सिंचनासाठी पाणी दिले जाणार आहे. पण पाणी शेवटच्या शेतापर्यंत पोहोचायला हवे. त्यासाठी पाटचारी दुरुस्तीदेखील करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. हतनूरमधून कालव्यास पाणी या आठवड्यात सोडण्यात आले आहे. ते चोपडापर्यंत पोहोचले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.