
Yavatmal News : माळपठारावरील सावरगाव गोरे येथील पिण्याचे पाणी पेटले असून पाणी देण्याचे आश्वासन देणाऱ्या सरपंचाला महिला व गावकऱ्यांनी दोराने बांधून मोर्चाद्वारे एसडीओ कार्यालयात आणले.
‘सरपंच साहेब निवडून आले, पाण्याचे आश्वासन विसरून गेले’ अशा घोषणा देत आलेल्या मोर्चाने महसूल व पंचायत प्रशासन चक्रावून गेले. उन्हाळा सुरू होताच माळपठारावरील पिण्याच्या पाण्याची समस्या तीव्र होत आहे. नदी-नाले कोरडी पडली असून विहिरीसुद्धा खोल जात आहेत.
माळपठारावरील सावरगाव गोरे येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई भेडसावत आहे. त्यामुळे सावरगावच्या सरपंचाला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले.
सरपंचाच्या छातीवर फलक लावून, दोराने हात बांधून महिलांनी घागर मोर्चा काढत उपविभागीय कार्यालयावर धडक दिली. या मोर्चात महिला डोक्यावर रिकाम्या घागर घेऊन मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. हा मोर्चा उपविभागीय कार्यालयावर नेण्यात आला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.