
Dharashiv News : आता कुठे उन्हाळ्याची चाहूल लागली आहे, तोच जिल्ह्यातील २२६ प्रकल्पांतील उपयुक्त पाणीसाठा ५८.४ टक्क्यांपर्यंत खाली घसरला आहे. अजून उन्हाळ्याचे चार महिने बाकी असून, तोपर्यंत पाणी पुरविण्याची कसरत प्रशासनाला करावी लागणार आहे.
आठवड्याला दोन टक्के घटणारा पाणीसाठा गेल्या आठवड्यात पहिल्यांदाच ३ टक्क्यांनी कमी झाला आहे. त्यावरून पाणी उपशाचे प्रमाण वाढल्याची स्थिती स्पष्ट होत असून, आताच पाणी उपशाचे योग्य नियोजन करण्याची गरज आहे.
गेल्यावर्षी पावसाळ्याअखेर ७५ टक्क्यांवर गेलेला उपयुक्त पाणीसाठा १७ टक्क्यांनी घटला आहे. त्यातही संख्येने सर्वाधिक असलेल्या २०८ लघू प्रकल्पांतील उपयुक्त पाणीसाठा ५१.२३ टक्क्यांवर आलेला आहे. दर आठवड्याला सरासरी दोन टक्क्यांनी घटणारा साठा आता तीन टक्क्यांनी घटू लागला आहे.
गेल्या आठवड्यात ६१ टक्के उपयुक्त पाणीसाठा होता. तो आता ५८ टक्क्यांवर आला आहे. सर्वांत मोठ्या सीना कोळेगाव प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा ७७ टक्के आहे. जिल्ह्यात सध्या केवळ २ लघू प्रकल्प १०० टक्के भरलेले आहेत.
याशिवाय ७५ टक्क्यांवर उपयुक्त पाणीसाठा असलेल्या प्रकल्पांची संख्या ५३ वर आली आहे. यात लघू ४६, मध्यम ६ आणि एका मोठ्या प्रकल्पाचा समावेश आहे. ही संख्या आठवडाभरापूर्वी ६० होती. म्हणजेच ७५ टक्क्यांवर उपयुक्त पाणीसाठा असलेल्या प्रकल्पांत आठवड्यात ७ प्रकल्पांची घट झाली आहे.
३७ प्रकल्पांतील पाणीसाठा २५ टक्क्यांपेक्षा कमी
दरम्यान, २५ ते ५० टक्के उपयुक्त पाणीसाठा असलेले प्रकल्प ३७ वर आले आहेत. गेल्या आठवड्यात ही संख्या ३९ होती. उपयुक्त पाणीसाठा जोत्याखाली असलेल्या प्रकल्पांची मात्र गेल्या आठवड्याइतकीच दहावर कायम आहे. अद्याप जिल्ह्यातील एकही प्रकल्प कोरडा पडलेला नाही.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.