Hatnur Dam : हतनूर धरणातील गाळामुळे जलसाठ्यावर परिणाम

Water Storage Of Hatnur Dam : खानदेशात तापी नदीवर कुठलाही मोठा सिंचन प्रकल्प नाही. मध्यम प्रकल्प असून, त्यात सर्वांत जुना भुसावळनजीकचा (जि. जळगाव) हतनूर मध्यम प्रकल्प आहे.
Hatnur Dam
Hatnur Agrowon
Published on
Updated on

Jalgaon News : खानदेशात तापी नदीवर कुठलाही मोठा सिंचन प्रकल्प नाही. मध्यम प्रकल्प असून, त्यात सर्वांत जुना भुसावळनजीकचा (जि. जळगाव) हतनूर मध्यम प्रकल्प आहे. यातही गाळ साचत असून, हा गाळ रिकामा करणेही शक्य नसल्याची स्थिती आहे.

तापी नदीला दुष्काळी स्थितीतही पूर येतो. ही नदी जूनमध्येच प्रवाही होते. कारण या नदीचे उगमक्षेत्र सातपुडा पर्वतरांगांत मध्य प्रदेशातील बैतुलमध्ये आहे. खानदेशात तापी सर्वांत महत्त्वाची नदी असून, या नदीमुळे जळगावातील रावेर, यावल, मुक्ताईनगर, चोपडा, जळगाव, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारमधील शहादा, तळोदा, अक्ललकुवा या तालुक्यांना मोठा लाभ होत आहे.

तापीकाठचा परिसर केळी, ऊस, भाजीपाला शेतीत पुढे आहे. तापी नदीवर खानदेशात जळगावात हतनूर हा सर्वांत जुना व एकमेव मध्यम प्रकल्प आहे. त्याची साठवण क्षमता सुमारे नऊ टीएमसी आहे.

Hatnur Dam
Hatnur Dam : ‘हतनूर’वरील भूकंप मापक यंत्रणा बंद; शासनाचे दुर्लक्ष

त्याद्वारे पाटातून रावेर, यावल व चोपडा तालुक्यात रब्बीला पाणी दिले जाते. भुसावळातील दीपनगर औष्णीक वीज केंद्र, जळगावातील औद्योगिक वसाहत, भुसावळ शहर, वरणगाव (ता. भुसावळ) येथील आयुध निर्माणीतही हतनूरमधून पाणी दिले जाते.

तापी नदीवर अलीकडेच जळगाव व यावल तालुक्याच्या सीमांलगत शेळगाव बॅरेज उभे राहिले आहे. पण त्याचे पाणी शेतापर्यंत पाटाद्वारे पोहोचत नाही. तापीवर धुळ्यात सुलवाडे बॅरेज, नंदुरबारमध्ये सारंगखेडा व प्रकाशा बॅरेज हे मध्यम प्रकल्प आहेत.

त्यांतूनही शेतापर्यंत पाणी नेण्याची योजना नाही. यातच हतनूर प्रकल्पात गाळ वाढला आहे. त्यातील गाळ काही वर्षींपूर्वी ४९ टक्के एवढा होता. पण आजघडीला या प्रकल्पात सुमारे ५२ टक्के गाळ आहे.

Hatnur Dam
Hatnur Dam : हतनूर धरणातून विसर्ग घटला

गाळाचा उपसा करणेही शक्य नाही. त्यासंबधी पाटबंधारे विभागासह अन्य संस्थांनी सर्वेक्षण केले आहे. गाळ काढण्यासाठी मोठा निधी लागणार आहे. हा निधी शासनाला खर्च करणे परवडणारे नाही. यामुळे हतनूरमध्ये निम्मा गाळ साचतो व निम्मेच पाणी असते, अशी स्थिती आहे.

पूर्णा नदीसह सुपीक मातीच्या प्रदेशामुळे गाळ

हतनूर धरणाचे पाणलोट क्षेत्र सुपीक मातीचे आहे. या भागातील माती या प्रकल्पात पुरासमवेत येते. विदर्भातील पूर्णा नदीदेखील तापी नदीस चांगदेव (ता. मुक्ताईनगर) नजीक येऊन मिळते. पूर्णा नदीतही गाळ असतो. काळी कसदार जमीन पूर्णा काठी व तापी नदीत वाहून येते. यामुळे हतनूरमध्ये गाळाची समस्या दरवर्षी वाढली आहे, अशी माहिती मिळाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com