
Amaravati News : जिल्ह्यात दोन दिवस झालेल्या वादळी वारा व गारपिटीसह अवकाळी पावसाचा चिखलदरा, भातकुली, चांदूरबाजार, अचलपूर, मोर्शी, नांदगाव खंडेश्वर व धामणगावरेल्वे या सात तालुक्यांना फटका बसला आहे.
दोघांचा वीज पडून मृत्यू झाला असून पाच जनावरे दगावली. वादळी पावसामुळे गोठ्यासह १२ घरांची पडझड झाली, तर १० हजार १४६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
सोमवारी आणि मंगळवार (ता. ६) अशा दोन दिवस वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. वीज पडून धामणगावरेल्वे व चिखलदरा तालुक्यांत दोन जणांना मृत्यू झाला, तर धामणगावरेल्वे, मोर्शी आणि नांदगाव खंडेश्वर तालुक्यात पाच जनावरे दगावलीत. चिखलदरा, नांदगाव खंडेश्वर, धामणगावरेल्वे व अचलपूर या तालुक्यातील पाच गावांमध्ये १२ घरांची पडझड झाली आहे.
अवकाळी पावसाचा फटका उन्हाळी पिकांना बसला असून चिखलदरा, भातकुली, चांदूरबाजार, अचलपूर आणि मोर्शी या पाच तालुक्यांत उन्हाळी मूग, कांदा, संत्रा, केळी व ज्वारी या पिकांचे नुकसान झाले आहे.
५६ गावांतील १० हजार १४६ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले असल्याचा जिल्हा प्रशासनाचा प्राथमिक अहवाल आहे. यामध्ये अचलपूर तालुक्यात सर्वाधिक पाच हजार ३२१, तर चांदूरबाजार तालुक्यातील चार हजार ८२१ हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.