Latur News : लातूर जिल्ह्यात रविवारी (ता. २६) दुपारी चार वाजता वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात वीज अंगावर पडून दोन तर आंब्याचे झाडे अंगावर पडून एका शेतकऱ्यांचा मृत्यू जागीच मृत्यू झाला.
महाळंगी येथील शिवाजी नारायण गोमचाळे (वय ३५ वर्षे) व ओम लक्ष्मण शिंदे (वय ३० वर्षे, रा. महाळंगी, ता. चाकूर) यांचा वीज पडून तर पानचिंचोली (ता. निलंगा) येथील बळिराम व्यंकट हणमंते (वय ) यांचा अंगावर आंब्याचे झाड पडून त्यांचा मृत्यू झाला. वादळी वाऱ्यामुळे फळबागांचे नुकसान झाले असून झाडे उन्मळून पडल्याने घरे व वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.
या पावसामुळे चार म्हशीही वीज पडून दगावल्या असून त्यात शिवणखेड (ता. चाकूर) येथील श्री प्रभू रामा कोपले, शेळगी (ता. निलंगा) येथील दत्तात्रय गोविंद रोडे, हालकी येथील गंगाधर माधवराव बामनकर, तांदुळजा (ता. लातूर) येथील ईश्वर सराफ तर काटगाव येथील विठ्ठल राठोड यांच्या म्हशींचा समावेश आहे.
रविवारी दुपारी जिल्ह्यातील चाकूर, निलंगा, शिरूर अनंतपाळ व लातूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. यात घरावरील पत्रे उडून जाण्यासह झाडे उन्मळून पडली. वीजेचे खांबही कोसळ्याने वीज पुरवठा खंडित झाला असून फळबागांचेही नुकसान झाले आहे. झरी खुर्द येथील गणेश सूर्यवंशी या दोन एकर केळीची बाग उद्ध्वस्त झाली आहे.
दरम्यान महाळंगी येथे वीज पडून मृत्यू पावसेल्या दोन शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहत वीजेबाबत शेतकऱ्यांनी काळजी घ्यावे, असे आवाहन अहमदपूरचे आमदार बाबासाहेब पाटील केले आहे. रविवारी दुपारी धाराशिव जिल्ह्यातही अवकाळी पावसाने हजेरी लावली. वाशी, परंडा व धाराशिव जिल्ह्यात पाऊस झाला. यात तुळजापूर येथे वीजेचा धक्का लागून दोन म्हशी मृत्यूमुखी पडल्या.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.