
Solapur News : उजनी धरण आता ९४ टक्के भरले असून धरणात सध्या ११४ टीएमसी पाणीसाठा आहे. धरणातून भीमा नदीत सोडलेला विसर्ग १० हजाराने कमी करून तो आता पाच हजार क्युसेक एवढाच ठेवला आहे.
दुसरीकडे कालव्यातून २१०० क्युसेकने पाणी सोडल्याने कॅनॉल सध्या तुडुंब भरून वाहत आहेत. उजनीत सध्या दौंडवरून आठ हजार क्युसेकची आवक आहे. २७ मेपर्यंत उणे पातळीतील उजनी धरणात २० जूनपर्यंत १०० टीएमसी पाणीसाठा जमा झाला.
मागील महिनाभरात उजनीत ४० टीएमसी पाणी साठविण्यात आले आहे. सध्या उजनीत दौंडवरून आठ हजार क्युसेकची आवक आहे. धरणात जमा होणारा विसर्ग कमी झाल्याने उजनीतून भीमा नदीत सोडलेला विसर्ग कमी करण्यात आला आहे.
दुसरीकडे पावसाने काही दिवस दडी मारली असून पेरणीचे क्षेत्र वाढल्याने आता कालव्यातून सोडलेल्या पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. परंतु, मे-जूनमधील पावसामुळे विहिरी, बोअरवेल्स, ओढ्यात अजूनही पाणी आहे.
त्यामुळे बहुतेक शेतकरी कॅनॉलचे पाणी घेत नसल्याने ते पाणी थेट नदीला जाऊन मिळत असल्याचे चित्र आहे. पावसाळा अजून दोन महिने शिल्लक असल्याने या काळात धरण १०० टक्के भरेल, असा विश्वास लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
उजनीतून सोडलेला विसर्ग
भीमा नदीतून : ५००० क्युसेक
वीजनिर्मिती प्रकल्प : १६०० क्युसेक
कॅनॉलमधून : २१०० क्युसेक
सीना-माढा,दहिगाव उपसा सिंचन : २६० क्युसेक
बोगदा : ४०० क्युसेक
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.