Dasara Melava 2023 : दुष्काळ पडला असताना तुम्हाला पीक विमा कंपन्या जुमानत नाहीत ? ; उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्ला

Uddhav Thackeray News : शिवसेना (ठाकरे गट) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी शिवाजी पार्क मैदानावरील दसरा मेळाव्यात शेतकरी प्रश्नावर सरकारवर हल्ला चढवला.
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray Agrowon
Published on
Updated on

Uddhav Thackeray Speech Dasara Melava 2023 : दुष्काळ आणि अग्रीम पीक विम्याच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर निशाणा साधला आहे. राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झालीय.

खरीप हंगाम वाया गेल्याने शेतकरी अडचणीत आहे. अशा परिस्थिती पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांना अग्रीम नुकसान भरपाईसाठी हात वर करत असताना सरकार काय करतयं ? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

Uddhav Thackeray
Cotton Grow Farmers : सरकारने कापूस आयात केल्यानेच शेतकरी आत्महत्येचा छायेत, अनिल देशमुखांचा आरोप

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्याच्या आपल्या भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारवर हल्ला चढवला. शिर्डी परिसरातील गावांमध्ये दुष्काळी पाहणी दौऱ्यासाठी आपण तिथे गेलो होतो. तिथली शेतकऱ्यांची परिस्थिती पाहून आपल्या आयुष्यातील सर्वात भावनिक प्रसंग काय होता, या विषयी उद्धव ठाकरे यांनी जाहिरपणे भाष्य केले.

सुरुवातीला ठाकरे यांनी एक रुपयात पीक विमा योजनेचे कौतुक केले. शेतकऱ्यांचा हिस्सा सरकारने भरल्याने पीक विमा योजनेत सुमारे १ कोटी ७० लाख शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला. पण आता पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगामातील पिके वाया गेली आहेत.

सरकारकडून पंचनामे पूर्ण होईपर्यंत सरकाराने अग्रीम भरपाई देण्याचे आदेश काढले. पण विमा कंपन्यांनी ते देण्यास नकार दिला आहे. अनेक ठिकाणी २१ दिवस पावसाचा खंड पडला नसल्याचा किवा नुकसानीची नोंद न केल्याने भरपाई देण्यास टाळाटाळ केली जात आहे. मग सरकार काय करतयं? असा जाब ठाकरेंनी विचारला.

Uddhav Thackeray
Sharad Pawar News : मुख्यमंत्र्यांनी काम नाही केलं तर कार्यक्रम करायचा..; शरद पवारांचा इशारा

ठाकरे यांनी शिवसैनिकांना आदेश देत शेतकरी अडचणीत असल्याने त्यांच्या मदतीला उभे राहण्याचे आवाहन केले. शिवसैनिकांनी पीक विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना घेराव घालून बसा. जोपर्यत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत नाही. तोपर्यंत त्याला जागचे हालून देऊन नका, मग कळेल पावसाचा खंड पडल्यावर काय होते.

भाषणाच्या सुरुवातीला मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे कौतुक केले. मनोज जरांगे पाटील यांचे शांततेत आंदोलन सुरु होते. मात्र या डायर सरकारने जालियनवालाप्रमाणेच या शांततेत सुरु असलेल्या आंदोलनावर लाठी हल्ला केला. यावेळी त्यांनी शिंदे सरकारवर सडकून टीका केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com