Cotton Grow Farmers : सरकारने कापूस आयात केल्यानेच शेतकरी आत्महत्येचा छायेत, अनिल देशमुखांचा आरोप

Vidarbha Farmers : १६ लाख कापसाच्या गाठी केंद्र सरकारने आयात करून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केल असल्याची टीका राष्ट्रवादीचे आमदार अनिल देशमुख यांनी केली आहे.
Cotton Grow Farmers
Cotton Grow Farmersagrowon
Published on
Updated on

Agriculture News : कॅाटन असोसिएशन ॲाफ इॅडियाच्या दबावामुळे केंद्र सरकारने कापसावरील ११ टक्के आयात शुल्क रद्द केला आहे. यामुळे १६ लाख कापसाच्या गाठी केंद्र सरकारने आयात करून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केल असल्याची टीका राष्ट्रवादीचे आमदार अनिल देशमुख यांनी केली आहे. या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी आत्महत्या वाढत असल्याची टीका सरकारवर देशमुख यांनी केली.

यावेळी अनिल देशमुख म्हणाले की, दर न मिळाल्याने शेतकऱ्यांचा दसरा आणि दिवाळी अंधारात जाण्याची वेळ आली आहे. सध्या कापूस आणि सोयाबीनचा उत्पादन खर्चही शेतकऱ्यांना परवडत नाही. तर राज्य सरकारने कापूस आणि सोयाबीनच्या नुकसानीचे पंचनामे केले आहेत. १ हजार ७१ कोटीच्या मदतीची घोषणा केली. शेतकऱ्यांच्या खात्यात अद्यापही मदतीचे पैसे न आल्याने शेतकरी हवालदिल असल्याची खंत देशमुख यांनी व्यक्त केली.

सोयाबीनला चांगला भाव मिळाला नाही तर यंदा शेतकरी आत्महत्या वाढणार असल्याचे देशमुख म्हणाले. मदत न मिळाल्याने शेतकऱ्यांचा दसरा आणि दिवाळी अंधारात जाणार आहे. सरकार फोडाफोडीचं राजकारण करत आहे. त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळ नसल्याचे देशमुख म्हणाले.

महाविकास आघाडीची सत्ता होती त्यावेळी कापसाची आयात करण्यात आली नव्हती यामुळे कापसाला ११ हजार रुपयांपर्यंतचा दर मिळाला होता. सध्या शेतकरी अडचणीत आहे शेतकऱ्यांच्या मागण्याचा विचार करून सरकारने १२ हजार रुपये दर द्यावा. तसेच कापूस निर्यात अनुदान जाहिर करावे अशी मागणी देशमुख यांनी केली.

Cotton Grow Farmers
Vidarbha Monsoon Update : विदर्भात उन्हाचा चटका तापदायक ; मॉन्सूनच्या परतीसाठी पोषक स्थिती

सरकारच्या चुकीच्या धोरणामुळं फक्त यवतमाळ जिल्ह्यात ४६० शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. यवतमाळ जिल्ह्यात २०२२ मध्ये २७२ शेतकरी आत्महत्या, तर २०२३ मध्ये १८८ शेतकरी आत्महत्या झाल्याची आकडेवारी देशमुख यांनी सादर केली. तसेच हिवाळी अधिवेशनात आम्ही शेतकऱ्यांची बाजू ठामपण मांडणार आहे.

ललित पाटील आणि कंत्राटी भरती प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांनी कशी दिशाभुल केली? यावर वेगळी पत्रकार परिषद घेऊन बोलणार असल्याचे अनिल देशमुख म्हणाले. सरकार झोपलं आहे. कॅाटन असोशिएशन ॲाफ इंडियाच्या दबावामुळे केंद्र सरकारनं कापसावरील ११ टक्के आयात शुल्क रद्द केल्याचे अनिल देशमुख म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com