
Washim News: शेतीचा पारंपरिक स्वरूपातील तोटा आणि वाढती जोखीम लक्षात घेता, आता शेतीकडे उद्योगाच्या दृष्टीने पाहण्याची आवश्यकता आहे. एकाच पीक पद्धतीमुळे जमिनीची सुपीकता कमी होत असून, लागवडीचा खर्च, आर्थिक जोखीम आणि उत्पन्नातील अनिश्चितता या समस्या उग्र बनल्या आहेत.
यावर उपाय म्हणून शाश्वत शेती प्रणाली, समाकलित शेती तंत्र आणि मूल्यवर्धित शेती उत्पादन या मार्गांचा अवलंब करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन केव्हीकेचे प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रवींद्र काळे यांनी केले.
हरितक्रांतीचे जनक आणि भारतरत्न पुरस्कार प्राप्त शास्त्रज्ञ डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांचा जन्मदिवस कृषी विज्ञान केंद्रातर्फे शाश्वत शेती दिन म्हणून साजरा करण्यात आला. या निमित्ताने शेतकऱ्यांसाठी विशेष कृषी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी अध्यक्षस्थानावरून डॉ. काळे बोलत होते.
या वेळी केव्हीकेचे शास्त्रज्ञ डॉ. एस. के. देशमुख, एन. बी. पाटील, डॉ. डी. एन. इंगोले, मयूर देशमुख तसेच सहायक कृषी अधिकारी आर. डी. झोरे उपस्थित होते.एन. बी. पाटील यांनी पर्यावरणपूरक शेती, जैविक निविष्ठा वापर, मृदा आरोग्य व्यवस्थापन आणि सेंद्रिय शेतीची कार्यक्षम अंमलबजावणी यावर सखोल मार्गदर्शन केले.
त्यांनी शाश्वततेसाठी मृद्संधारण, शाश्वत पोषण व्यवस्थापन आणि फळबागांची बहुविधता यावर भर देण्याची गरज अधोरेखित केली. श्री. झोरे यांनी कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांबाबत सविस्तर माहिती दिली. या वेळी डॉ. इंगोले व श्री. देशमुख यांनीही शाश्वत शेतीविषयी आपले अभ्यासपूर्ण विचार मांडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. एस. के. देशमुख यांनी केले. सूत्रसंचालन प्रक्षेत्र व्यवस्थापक प्रमोद देशमुख यांनी केले तर एस. आर. बावस्कर यांनी आभार मानले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.