Shetkari Sahitya Sammelan : सरकारची शेतीविरोधी धोरणे अधोगतीस कारणीभूत

Anti-Agriculture Policy : जागतिकीकरणात शेतीक्षेत्राला पुढे जाण्यासाठी प्रचंड संधी आहेत. ‘इंडिया’कडून भारताकडे जाण्यासाठी मोठा वाव आहे. मात्र हे बदलाचे वारे आमच्यापर्यंत पोहोचू दिले जात जात नाही.
Shetkari Sahitya Sammelan
Shetkari Sahitya Sammelan Agrowon

Nashik News : जागतिकीकरणात शेतीक्षेत्राला पुढे जाण्यासाठी प्रचंड संधी आहेत. ‘इंडिया’कडून भारताकडे जाण्यासाठी मोठा वाव आहे. मात्र हे बदलाचे वारे आमच्यापर्यंत पोहोचू दिले जात जात नाही. नियंत्रणाच्या मोठ्या भिंती निर्माण केल्या जात आहे. त्यामुळे शेतीक्षेत्र अधोगतीकडे जात आहे व त्यासाठी सरकारची शेतीविरोधी धोरणे कारणीभूत आहेत, असा सूर ‘भारताकडून इंडियाकडे शेती बदलाचे वारे‘ या परिसंवादात उमटला.

शेती अर्थ प्रबोधिनीद्वारा सह्याद्री फार्म्स येथे आयोजित ११ व्या अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनात दुसऱ्या दिवशी (ता. ५) हा परिसंवाद झाला. स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष अनिल घनवट, शेतकरी संघटनेच्या नेत्या सीमा नरोडे, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे मृदा शास्त्रज्ञ डॉ. आदिनाथ ताकटे, रमेश खांडेभराड, संमेलनाचे कार्याध्यक्ष गंगाधर मुटे यांनी यात सहभाग घेतला.

Shetkari Sahitya Sammelan
Shetkari Sahitya Sammelan : सरकारकडे मागू नका, कुठलं सरकार आणायचं ते ठरवा

अनिल घनवट म्हणाले, की शेती बदलासाठी शरद जोशींनी दीर्घ लढा दिला. मात्र येथील व्यवस्थेने तो जाणीवपूर्वक हाणून पाडला. सरकारचे धोरणच शेतकऱ्याचे मरण ठरत आहे. सरकार नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देत आहे. मात्र ते पिकविणाऱ्या शेतकऱ्यांचा कोणताही विचार करायला तयार नाही. एकीकडे मोठ्या प्रमाणात तेल, कडधान्यांची प्रचंड आयात होत असताना आपल्या शेतकऱ्याकडील गहू, तांदूळ, तेलबिया, साखर, कांदा यावर मात्र निर्यातबंदी लादली जात आहे.

Shetkari Sahitya Sammelan
Shetkari Sahitya Sammelan : शेतकरी साहित्य संमेलन आजपासून होणार सुरू

नरोडे म्हणाल्या, की जोपर्यंत सरकारचे शेतीविरोधी धोरण बदलत नाही. तोपर्यंत भारताची इंडियाकडे वाटचाल होणार नाही. साहित्यिकांनी शेतकऱ्यांची ही कोंडी आपल्या साहित्यातून जोरकसपणे मांडली पाहिजे.

मुटे म्हणाले, की सरकारच्या शेतीविरोधी धोरणांनी शेतकऱ्यांची मार्केटिंग करण्याची क्षमताच संपवून टाकली आहे. त्यामुळे उत्पादनाच्या पलीकडे बाजारात शेतकरी हतबल झाला आहे. शरद जोशींनी भारत आणि इंडिया यांच्यातील दरी मिटविण्यासाठी चतुरंग शेतीची संकल्पना मांडली होती. आता या संकल्पनेची कास धरण्याची गरज आहे. डॉ. ताकटे यांनी शेती किफायतशीर होण्यासाठी शेतकऱ्यांनी मातीच्या आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे विशद केले. रमेश खांडेभराड यांनी सूत्रसंचालन केले.

‘जीएम, बीटी तंत्रज्ञान, इथॅनॉल निर्मितीची गरज’

जागतिक बाजारात टिकून राहायचे असेल तर खुल्या आभाळाखाली पारंपरिक पद्धतीने शेती करुन आता चालणार नाही. जगभरातील प्रगत राष्ट्रांत सिद्ध झालेले तंत्रज्ञान आपल्याला आपल्या शेतीत वापरावे लागेल. धोरणकर्ते मात्र याकडे डोळेझाक करीत आहेत. त्यांना शेतकरी गरीब, कर्जबाजारीच राहू द्यायचा आहे की काय अशी शंका येते. जीएम तंत्रज्ञान, इथेनॉल निर्मिती, बीटी तंत्रज्ञान ही तंत्रज्ञाने नव्या काळाची गरज आहे. मात्र त्याकडे सरकारकडून दुर्लक्ष केले जात आहे, अशी टीका अनिल घनवट यांनी केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com