
Chh. Sambhajinagar News : घाटनांद्रासह परिसरातील धारला, चारणेर, वाडी, पेंडगाव आदी शेतशिवारांमध्ये शेतकऱ्यांनी यावर्षी सुर्यफुलाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली आहे. सध्या हे पीक चांगलेच बहरात आले आहे.
सोयाबीन, भुईमूग या खाद्य तेल पिकांपाठोपाठ आता घाटनांद्रा शिवारातील शेतकरी सूर्यफुलाचे उत्पन्न घेण्याकडे वळले आहेत. बाजारात सूर्यफुलाच्या खाद्यतेलास मोठी मागणी असल्याने व शेती व्यवस्थापन आणि उत्पादन खर्च कमी, पाच ते सहा हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत असल्याने घाटनांद्रा धारलासह परिसरातील शेतकऱ्यांनी यंदा सूर्यफूल लागवडीकडे आपला मोर्चा वळवला आहे.
लागवडीनंतर सूर्यफुलाचे पीक अवघ्या तीन ते साडेतीन महिन्यांत तयार होते. सुधारित व संकरित जातीचे बियाणे निर्माण झाल्याने कमी वेळात व कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळविता येते. त्यामुळे याकडे नगदी पैसा मिळवून देणारे पीक म्हणून शेतकरी याकडे पाहत आहेत. कपाशीचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठीही एक पर्याय म्हणूनही काही शेतकरी या पिकाकडे पहात आहेत.
पिकाची लागवड व व्यवस्थापन तसेच मजुरांची गरज सुद्धा कमी भासते. पीक काढणीला सोपे असल्याने व भाव बऱ्यापैकी मिळत असल्याचे घाटनांद्रासह, धारला येथील शेतकरी सांगतात. धारला येथील तुकाराम ढोके, बालाजी मुंढे, रफिकमिया देशमुख, रखमाजी मोरे, दत्तु मोरे, प्रदिप बोरसे इतर अनेक शेतकऱ्यांनी यावर्षी सूर्यफुलाची लागवडीला पसंती दिली आहे. सध्या हे पीक चांगलेच बहरात आले असून संपूर्ण शिवार पिवळे धमक दिसू लागले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.