Sugarcane Maharashtra : महाराष्ट्राचे ऊस तोडणी कामगार राज्याबाहेर, कारखान्यांची यंत्रणा कोलमडल्याने ऊस शिवारातच

Maharashtra Sugarcane : राज्यातील ऊस तोडणी कामगार मोठ्या प्रमाणावर गुजरात, कर्नाटकमध्ये गेले आहेत.
Sugarcane Maharashtra
Sugarcane Maharashtraagrowon

Sugarcane Worker : महाराष्ट्रात १ नोव्हेंबरपासून उसाचा गळीत हंगाम सुरू झाला पहिल्या दोन आठवड्यात कारखान्याची यंत्रणा अत्यंत संथ गतीने सुरू होती. दरम्यान राज्यातील ९६ सहकारी व ९९ खासगी अशा एकूण १९५ साखर कारखाने सुरू आहेत. २८ डिसेंबर २०२३ अखेर राज्यात ३५६.१८ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले. गेल्या वर्षी याच तारखेपर्यंत ४४६.५७ लाख क्विंटल उत्पन्न झाले होते. या वर्षी उत्पादनात ९०.३९ लाख क्विंटल घट झाली आहे.

दुष्काळी परिस्थितीमुळे महाराष्ट्रात ऊस खूपच कमी आहे. राज्यातील ऊस तोडणी कामगार मोठ्या प्रमाणावर गुजरात, कर्नाटकमध्ये गेले आहेत. याचा फटका बहुतांशी साखर कारखान्यांना बसत आहे. ऊस असूनही वेळेवर तोडणी होत नसल्याने कारखाने पूर्ण क्षमतेने चालत नाहीत. याचाच परिणाम साखर उत्पादनावर झाला आहे. राज्यात २०२२ मध्ये १०२ सहकारी व ९९ खासगी अशा २०१ कारखाने सुरु होते.

२८ डिसेंबरपर्यंत या कारखान्यांमधून ४७८.९४ लाख टन उसाचे गाळप होऊन ४४६.५७ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले. या तुलनेने यंदा सहा सहकारी साखर कारखाने बंद झाले. १९५ कारखान्यांमधून ४०२.८४ लाख टन उसाचे गाळप होऊन ३५६.१८ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले.

यावर्षी ऊस तोडणी कामगारांचा प्रश्न सर्वच कारखान्यांना भेडसावत आहे. वेळेवर ऊसतोड होत नसल्याचा फटका उसाचे वजन घटण्यावर व साखर उताऱ्यावर होत आहे. गेल्या वर्षी साखर उतारा ९.३२ होता. यावर्षी तो ८.८४ वर आला आहे. कोल्हापूर वगळता एकही विभागाचा साखर उतारा दहापेक्षा अधिक नाही.

राज्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने गळीत हंगामाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले होते. पुरेसे काम मिळेल की नाही या शक्यतेने बहुतांशी ऊसतोडणी कामगार गुजरात, कर्नाटकमध्ये गेले. शेतात ऊस उभा आहे. शेतकरी कारखान्यांकडे ऊस गाळपाबाबत विचारणा करीत आहेत. मात्र ऊसतोडणी कामगारांअभावी कारखाने पूर्ण क्षमतेने चालत नाहीत.

Sugarcane Maharashtra
Sugar Assessment : राज्य बँकेने साखरेचे मूल्यांकन ३०० रुपयांनी वाढविले

उसाच्या नव्या लागवडीत ६५ टक्के घट

यावर्षी पावसाने मारलेली दडी, रिकामे होत असलेले उजनी धरण, येत्या जूनमध्ये पाऊस वेळेवर हजेरी लावेल की नाही ? याची नसलेली शाश्वती यामुळे जिल्ह्यातील साखर उद्योगाने धास्ती घेतली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात फक्त ३५ टक्केच उसाची नव्याने लागवड झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ६५ टक्क्यांची घट नव्या लागवडीत झाली आहे.

राज्यातील साखर कारखानदारांनी ठरलेली एफआरपी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वेळेवर अदा करावी. अपुरा ऊस पुरवठा तसेच ऊस तोडणी मजुरांच्या कमतरतेमुळे अनेक कारखाने कसेबसे सुरू आहेत. शेतकऱ्यांचा सर्व ऊस गाळप केला जाईल, यासाठी जिल्हाधिकारी पातळीवर आतापासूनच नियोजन करणे गरजेचे असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समन्वयक कुबेर जाधव म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com