
Kolhapur News : ऊस शेती करताना शास्त्रशुद्ध पद्धतीने करणे गरजेचे आहे. बियाणे निवड ते तोडणीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर अभ्यासपूर्ण पद्धतीने शेतीचे व्यवस्थापन गरजेचे आहे.
तरच उसाचे उत्पादन वाढून ऊस शेती फायदेशीर होईल, असे प्रतिपादन छत्रपती शाहू महाराज कोल्हापूर कृषी महाविद्यालयाचे विस्तार विद्यावेत्ता डॉ. अशोक पिसाळ यांनी केले.
खुपिरे (ता. करवीर) येथे ‘ॲग्रोवन’च्या १८ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित ‘ऊस वाढीची मूलतत्वे’वरील ‘ॲग्रो संवाद’ कार्यक्रमात डॉ. पिसाळ बोलत होते. यारा फर्टिलायझर्स इंडिया प्रा. लि. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते.
‘ॲग्रोवन’, यारा फर्टिलायझर्स व ग्रामपंचायत खुपिरे यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम झाला. कुंभी कारखाना अध्यक्ष माजी आमदार चंद्रदीप नरके अध्यक्षस्थानी होते.
कुंभी संचालक संजय पाटील, यशोदा पाटील, सरपंच तृप्ती पाटील, संजय पाटील, के. डी. पाटील, आनंदा जगदाळे, चंद्रकांत पाटील, तानाजी मोरे, संतोष मोरे, कृषीभूषण पुरस्कार प्राप्त उज्ज्वला कोपार्डेकर, ‘ॲग्रोवन’चे जिल्हा प्रतिनिधी राजकुमार चौगुले उपस्थित होते.
‘ॲग्रोवन’चे सहायक व्यवस्थापक विशाल जाधव यांनी सूत्रसंचालन केले. ‘सकाळ’चे तालुका बातमीदार कुंडलिक पाटील यांनी आभार मानले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.