
Nandurbar News : ‘ॲग्रोवन’च्या १८ व्या वर्धापन (Agrowon Anniversary) दिनानिमित्त म्हसावद (ता. शहादा, जि. नंदुरबार) येथे पपई व सोयाबीन पिकाबाबत मार्गदर्शनासंबंधी 'ॲग्रोवन संवाद’ कार्यक्रम घेण्यात आला. भक्तनिवास सभागृहात हा कार्यक्रम झाला. यारा फर्टिलायझर्स इंडिया प्रा.ली. हे कार्यक्रमाचे प्रायोजक होते.
या वेळी व्यासपीठावर धुळे येथील कृषी विज्ञान केंद्रातील विषय विशेषज्ञ डॉ. श्रीधर देसले, कोळदा (ता. नंदुरबार) येथील कृषी विज्ञान केंद्रातील विषय विशेषज्ञ पद्माकर कुंदे, यारा फर्टिलायझर्स इंडिया प्रा. लि.चे प्रतिनिधी सतीश वाघ उमेश पाटील, म्हसावदचे माजी उपसरपंच प्रकाश पाटील, शेतकरी उत्तम भुता पाटील आदी होते.
डॉ. देसले यांनी भाजीपाला व फळ पीक व्यवस्थापनाबाबत माहिती दिली. ते म्हणाले, की पीक व्यवस्थापन करताना पीकवाढीचे विविध टप्पे लक्षात घेऊन कार्यवाही करावी लागते. त्यात पाण्याचा निचरा होणारी व काळी कसदार जमीन लक्षात घेऊन लागवड व सिंचन व्यवस्थापन करावे, असे सांगितले.
कुंदे म्हणाले, की नंदुरबार जिल्हा पपईसाठी प्रसिद्ध आहे. पपईची लागवड वाढली. पण पपईतही विषाणूज्य रोग येऊन नुकसान होते. त्यासाठी लागवड व्यवस्थापन तंत्र व उत्तम वाण निवड करून कार्यवाही करावी.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.