
Chh. Sambhajinagr News : मराठवाडा व खानदेशातील पाच जिल्ह्यातील २२ साखर कारखान्यांनी यंदाच्या ऊस गाळप हंगामात सहभाग या कारखान्यांनी ७८ लाख ७८ हजार २८० टन उसाचे गाळप करत सरासरी ७.९१ टक्के साखर उताऱ्याने ६२ लाख ३३ हजार ५४५ क्विंटल साखरेचे उत्पादन केले. दरम्यान गाळप करणाऱ्या कारखान्यांपैकी १० कारखान्याचा ऊस गाळप हंगाम आटोपला आहे.
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड तसेच खानदेशातील नंदुरबार व जळगाव या पाच जिल्ह्यातील २२ साखर कारखान्यांनी यंदाच्या ऊस गाळप हंगामात सहभाग नोंदविला. यामध्ये सहकारी १३ व खासगी ९ कारखान्यांचा समावेश आहे. १३ सहकारी साखर कारखान्यांची दैनिक गाळप क्षमता ४४ हजार १५० तर खासगी ९ कारखान्यांची क्षमता सरासरी ४९ हजार ५०० टन इतकी आहे.
तेरा सहकारी साखर कारखान्यांनी ३३ लाख ६५ हजार ३२८ टन उसाचे गाळप करत २६ लाख ३ हजार ८९० क्विंटल साखरेचे उत्पादन केले. या सहकारी साखर कारखान्यांचा सरासरी साखर उतारा ७.७४ टक्के राहिला. नऊ खासगी कारखान्यांनी ४५ लाख १२ हजार ९५२ टन उसाचे गाळप करत सरासरी ८.०४ टक्के साखर उताऱ्याने ३६ लाख २९ हजार ६५५ क्विंटल साखरेचे उत्पादन केले.
नंदुरबार जिल्ह्यातील दोन्ही कारखान्यांनी आपले ऊस गाळप आटोपले आहे. दोन्ही कारखान्यांनी सात लाख ८८ हजार १२० टन उसाचे गाळप करत सरासरी ६.३६ टक्के साखर उताऱ्याने पाच लाख ९ क्विंटल साखरेचे उत्पादन केले. दोन्ही कारखान्याचें गाळप अनुक्रमे ११ व २२ फेब्रुवारी रोजी बंद झाले. जळगाव जिल्ह्यातील एका कारखान्याने एक लाख चार हजार ३२९ टन उसाचे गाळप करत सरासरी १०.०७ टक्के साखर उताऱ्याने एक लाख ५ हजार ५० क्विंटल साखरेचे उत्पादन केले.
मराठवाड्यातील गाळप स्थिती अशी...
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तीन सहकारी व चार खासगी मिळून सात कारखान्यांनी १८ लाख ३४६७ टन उसाचे गाळप करत सरासरी ९.२% साखर उताऱ्याने १७ लाख ८९ हजार १०४ क्विंटल साखरेचे उत्पादन केले. जिल्ह्यातील सात पैकी दोन कारखान्यांचे गाळप अनुक्रमे १८ व २८ फेब्रुवारी रोजी थांबले आहे. जालना जिल्ह्यातील दोन सहकारी व दोन खासगी मिळून ४ कारखान्यांनी यंदाच्या ऊस गाळपात सहभाग घेतला.
चारही कारखान्यांनी २० लाख १० हजार ८७७ टन उसाचे गाळप करत सरासरी ८.३६ टक्के साखर उताऱ्याने १६ लाख ८१ हजार १२५ क्विंटल साखरेचे उत्पादन केले. बीड जिल्ह्यातील ६ सहकारी व २ खाजगी मिळून आठ कारखान्यांनी यंदाच्या ऊस गाळपात सहभाग नोंदविला. या कारखान्यांनी ३१ लाख ७१ हजार ४८७ टन उसाचे गाळप करत सरासरी ६.८% साखर उताऱ्याने २१ लाख ५७ हजार ३६६ क्विंटल साखरेचे उत्पादन केले. ऊस गाळपात सहभागी असलेल्या साखर कारखान्यांपैकी ५ कारखान्यांचा गाळप हंगाम अनुक्रमे २२, २५, २७ व २८ फेब्रुवारी रोजी आटोपला आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.