
Patiyala News: केवळ खऱ्या पात्र शेतकऱ्यांनाच अनुदान मिळावे, असे मत केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी व्यक्त केले आहे. पंजाबमधील पतियाळा येथे 'विकसित कृषी संकल्प अभियाना'अंतर्गत बुधवारी (ता.११) कृषिमंत्र्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.
यावेळी शेती क्षेत्राला पुढे नेण्यासाठी शेतकऱ्यांच्या समस्यांवर चर्चा करून उपाययोजना केल्या जातील, असा दावा कृषिमंत्री चौहान यांनी केला.अनुदानाच्या योग्य वितरणासाठी पात्रतेची कसून तपासणी होणे आवश्यक असल्याचे मत चौहान यांनी व्यक्त केलं.
"शेतीच्या विकासासाठी पिकांच्या वैविध्यतेचा आणि पाण्याची बचत करणाऱ्या पद्धतींचा अवलंब करावा.तसेच पंजाबमधील शेतकऱ्यांनी गहू, भात, मका आणि सोयाबीनचं विक्रमी उत्पादन घेतलं. परंतु या पिकांऐवजी कमी पाणी लागणारे आणि फायदेशीर पिकं घ्यावीत." असा सल्लाही कृषिमंत्र्यांनी दिला.
तसेच, किमान आधारभूत किंमतीच्या म्हणजेच हमीभावाच्या खाली खरेदी होणार नाही, याची खात्री देण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारांनी एकत्र काम करावे, असेही निर्देश चौहान यांनी दिले. पुढे ते म्हणाले, या अभियानांतर्गत २ हजारांहून अधिक पथकं ७०० हून अधिक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांशी थेट संवाद साधत आहेत.
या पथकांमध्ये शास्त्रज्ञ, तज्ज्ञ, अधिकारी आणि प्रगतिशील शेतकरी यांचा समावेश असल्याचंही चौहान यांनी सांगितले. चौहान यांनी शेती यंत्रसामग्रीच्या निर्यातीवर भर देत भारताला यात अग्रेसर बनवण्याचे उद्दिष्ट ठेवल्याचं सांगितलं. तसेच शेतकऱ्यांनी कमी दर्जाच्या बियाणे आणि कीटकनाशकांबाबत तक्रारी नोंदवल्या.
त्यावर कठोर कायदे करून ही समस्या सोडवण्याचे आश्वासन चौहान यांनी दिले. दरम्यान, या सर्व उपाययोजनांमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यास आणि शेतीला अधिक समृद्ध करण्यास मदत होईल, अशी अपेक्षा चौहान यांनी व्यक्त केली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.