
Jalgaon News : खानदेशात डिसेंबर २०२४ मध्ये विविध भागात वादळी पाऊस झाला आहे. याचा फटका पिकांसह पशुधनासही बसला आहे. सर्वाधिक फटका केळीला बसला आहे. परंतु शासनाकडून केळी उत्पादकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले नसल्याची स्थिती आहे.
केळीला सर्वत्र म्हणजेच नंदुरबारमधील शहादा, तळोदा, धुळ्यातील शिरपूर, जळगावातील जळगाव, रावेर, यावल, चोपडा, रावेर, जामनेर, पाचोरा-भडगाव, चाळीसगाव या भागांत वादळी पावसाचा फटका बसला आहे. परंतु प्रशासनाने कुठेही पंचनामे करून केळीच्या नुकसानीचा अहवाल तयार केला नसल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत.
केळी उत्पादकांना विमा योजनेतून नुकसान भरपाई मिळते, असे सांगून तलाठी पंचनाम्यांसाठी फिरकलेच नाहीत. यात निवडणूक कामाचा बहाणादेखील पुढे करण्यात आला. खानदेशात ५ मे पासून आतापर्यंत विविध भागात वादळी पाऊस, गारपीटही झाली आहे. केळीची पाने फाटल्यास झाड अन्नघटक ग्रहण करू शकत नाही.
त्याचे ३० ते ३५ टक्के नुकसान होते. तसेच झाड आडवे झाल्यास, वाकल्यास तेदेखील उत्पादनक्षम नसते. परंतु या समस्यांकडे प्रशासन दुर्लक्ष करते. नुकसान ३३ टक्क्यांवर झालेले नाही, असे साांगून महसूल, कृषी यंत्रणांनी पंचनामे करणे टाळले आहे.
केळीला दर नाहीत. त्यात रोज वादळ, गारपीट, नुकसान अशी स्थिती आहे. यामुळे केळी उत्पादक हवालदील झाले असून, नुकसान भरपाई शासनाने द्यावी, अशी मागणी केली जात आहे. नुकसान झाल्यास आदेशांची वाट न बघता पंचनामे करण्याचे आदेश शासनाचे आहेत. परंतु टक्केवारीच्या खेळात पंचनामे रखडले, असेही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.