Tuljapur News : तुळजापुर तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे फळबागांचे तसेच घरांचे नुकसान झाले आहे. तालुक्यात शनिवारी (ता. २५) आणि रविवारी (ता. २६) दोन दिवशी मोठ्या प्रमाणावर अवकाळी पाऊस वादळी वाऱ्यासह झाला. वादळामुळे अनेक घरावरील पत्रे उडाले. तसेच घरावरील पत्र्यावर असणारे दगड अनेक ठिकाणी पडले.
तालुक्यातील आंबा फळबाग तसेच केळी आणि अन्य फळबागांचेही नुकसान झाले आहे. तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी लावलेल्या केशर आंब्याच्या फळबागांचे नुकसान झाले आहे. तालुक्यातील अनेक भागातील विद्युत पुरवठा अजूनही खंडीत आहे. महावितरण कंपनीकडून वीज दुरुस्तीचे काम चालू आहे. तथापि वादळामुळे नुकसान जास्त झाले आहे. तालुक्यातील अनेक गावांमध्ये विद्युत पुरवठा अजून चालू झाला नाही.
मदत द्या, केवळ पाहणीचा फार्स नको
वादळी वाऱ्यामुळे नुकसान झालेल्या घराच्या मालकांना तातडीने मदत द्यावी. पत्र्यात राहणारा सामान्य माणूस असतो. अनेक घराचे पत्रे उडालेले आहेत. तातडीने शेतकऱ्यांना तसेच फळबाग पिकविणाऱ्या शेतकऱ्यांना अवकाळीमुळे नुकसान झाल्याने मदत द्यावी, अशी मागणी माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी केली आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.