
Ahilyanagar News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने निश्चित केलेल्या शंभर दिवसांच्या उद्दिष्टांपैकी ‘मागेल त्याला सौर कृषी पंप योजने’त ५२ हजार ७०५ सौर पंप बसविण्याचे उद्दिष्ट महावितरणने साठ दिवसांत पूर्ण केले, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिली.
शंभर दिवसांत म्हणजे १६ मार्च २०२५ पर्यंत विविध विभागांसाठी उद्दिष्टे निश्चित करण्यात आली आहेत. महावितरणने या कालावधीत मागेल त्याला सौर कृषिपंप योजनेत एकूण दीड लाख पंप बसविण्याचा टप्पा गाठण्याचे उद्दिष्ट ठरविले होते.
६ डिसेंबर रोजी ९७ हजार २९५ सौर कृषिपंप बसविण्यात आले होते. त्यानंतर ४ फेब्रुवारीपर्यंत महावितरणने ५३ हजार ९ सौर कृषी पंप बसविले. त्यामुळे मागेल त्याला सौर कृषिपंप योजनेत आतापर्यंत बसविलेल्या पंपांची संख्या १ लाख ५० हजार ३०४ झाली. नाशिक परिमंडळात २२ हजार ५०९ सौरपंप बसविले आहेत.
राज्यात ४ फेब्रुवारीअखेर बसविलेल्या १,५०,३०४ सौर कृषिपंपांमध्ये जालना (१८,४९४ पंप), बीड (१७,९४४), अहिल्यानगर (१३,३६६), परभणी (११,७५५), संभाजीनगर (९,३२९), नाशिक (९,१४३), हिंगोली (८,५३८), धाराशिव (६७६५) आणि जळगाव (६६४८) या जिल्ह्यांनी आघाडी घेतली आहे. सौर कृषिपंप बसविल्यावर शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीज उपलब्ध होत असल्याने त्यांची अनेक दशकांची मागणी पूर्ण होते.
योजनेचे स्वरूप
मागेल त्याला सौर कृषिपंप या राज्य सरकारच्या योजनेत केंद्र सरकारकडून ३० टक्के आणि राज्य सरकारकडून ६० टक्के अनुदान मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांना केवळ दहा टक्के रक्कम भरून सौर ऊर्जा निर्मिती करण्याचे सौर पॅनेल्स, कृषिपंप असा संपूर्ण संच मिळतो. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांसाठी लाभार्थी हिस्सा ५ टक्के असून त्यांना ९५ टक्के अनुदान मिळते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.