
Jalna News : मोसंबीचे शाश्वत व दर्जेदार उत्पादन घेण्यासाठी जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे व्यवस्थापन, पाण्याचे योग्य व्यवस्थापन व निचरा, कीड व रोगांचे व्यवस्थापन इत्यादी बाबी महत्त्वाच्या आहेत. मोसंबी फळपीक जालना जिल्ह्याची ओळख शेतकऱ्यांनी शास्त्रोक्त पद्धतीने मोसंबीचे व्यवस्थापन करून उत्पादनात वाढ करावी, असे मत मोसंबी संशोधन केंद्र व हिमायतबाग फळ संशोधन केंद्राचे माजी प्रभारी अधिकारी डॉ. एम. बी. पाटील यांनी व्यक्त केले.
खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्राच्यावतीने कृषी विज्ञान मंडळाचे ३२८ वे मासिक चर्चासत्र आणि जागतिक मृदा दिन नुकताच साजरा करण्यात आला. त्यावेळी डॉ. पाटील मोसंबी फळगळ या विषयावर मार्गदर्शन करीत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठवाडा शेती सहाय्य मंडळाचे सचिव कृषिरत्न विजयआण्ण बोराडे हे होते.
तर प्रमुख उपस्थिती म्हणून छत्रपती संभाजीनगरचे विभागीय कृषी सहसंचालक डॉ. तुकाराम मोटे, जालना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाचे उपसंचालक संजय कायंदे, जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी प्रदीप बैनाडे, कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. एस. व्ही. सोनुने यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या सुरवातीला आंतरराष्ट्रीय कीर्तीचे मृदशास्त्रज्ञ दिवंगत मृदशास्त्रज्ञ डॉ. एस. बी. वराडे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.विभागीय कृषी सहसंचालक डॉ. तुकाराम मोटे यांनी जमिनीचे महत्त्व सांगतांना जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढविण्याची गरज व्यक्त केली.
श्री. बोराडे म्हणाले, की शेतकरी सध्या विवंचनेत अडकला आहे. सध्या जमिनीतील सेंद्रिय कर्ब कमालीचा कमी झाल्याचे दिसून येत आहे. आपण मृत जमिनीवर शेती करीत आहोत, असे चित्र आहे. डॉ. वराडे यांच्यामुळे मला माती समजली. आपल्याला सेंद्रिय व नैसर्गिक शेतीकडे जायचे असल्यास जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण एक टक्क्यांपर्यंत वाढविणे आवश्यक आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने विविध कृषी पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांचा सत्कार कृषी विज्ञान मंडळाच्या वतीने करण्यात आला.
त्यात जिजामाता कृषिभूषण श्रीमती सुचिता शिनगारे (खेडगाव, ता. अंबड), वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पांडुरंग निवृत्ती डोंगरे (कर्जत, ता. अंबड), उदयसिंग सुकलाल चुंगडे (ठालेवाडी, ता. भोकरदन), रामदास शेषराव बारगाजे (भरडखेडा, ता. बदनापूर), वसंतराव नाईक शेतीमित्र श्रीकृष्ण नामदेव डोंगरे (बाजीउम्रद ता. जालना) आणि उद्यानपंडित रामेश्वर भगवान उबाळे (नांदापूर, ता. जालना) यांचा समावेश होता. तसेच डॉ. तुकाराम मोटे यांना महाराष्ट्र शासनाचा डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल व रायपूर (ता. परतूर) येथील तरुण शेतकरी उद्यानपंडित अभयकुमार काळुंके यांना नुकताच (ता. २) नवी दिल्ली येथे राष्ट्रीय पातळीवरील मिलेनियम फार्मर ऑफ इंडिया २०२४ हा पुरस्कार मिळाल्याबद्दल दोघांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
जागतिक मृदा दिनाच्या निमित्ताने प्रातिनिधिक स्वरूपात काही शेतकऱ्यांना मृदा आरोग्य पत्रिकांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. एस. व्ही. सोनुने यांनी केले. सूत्रसंचालन मृद्शास्त्रज्ञ राहुल चौधरी यांनी तर आभार गृह विज्ञान तज्ञ डॉ. संगीता कऱ्हाळे यांनी मानले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.