Water Storage Marathwada : मराठवाड्यातील पाणीसाठा १३ टक्क्यांवर

Water crisis : मराठवाड्यातील ८७७ प्रकल्पांमधील उपयुक्त पाणीसाठा १३.१० टक्क्यांवर आला आहे.
Water Storage
Water StorageAgrowon
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar News : मराठवाड्यातील ८७७ प्रकल्पांमधील उपयुक्त पाणीसाठा १३.१० टक्क्यांवर आला आहे. सर्वदूर व जोरदार पावसाअभावी नदी, नाल्यांना पाणी खळखळत नसल्याने प्रकल्पांमधील पाणीसाठ्यातही वाढ होताना दिसत नसल्याची स्थिती आहे.

जलसंपदा विभागाच्या माहितीनुसार मराठवाड्यातील ११ मोठ्या प्रकल्पांत १२ जुलैअखेर १४.५७ टक्केच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक होता. मध्यम आणि लघू प्रकल्पांची अवस्था आत्ताच्या घडीला अत्यंत बिकट आहे.

एकूण ७५ मध्यम प्रकल्पात केवळ ७.८६ टक्केच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असून, ७४९ लघू प्रकल्पातही केवळ ९.५६ टक्केच उपयुक्त पाणी उरले आहे. गोदावरी नदीवरील १५ बंधाऱ्यात १४.८३ टक्के, तर तेरणा, मांजरा, रेना नदीवरील २७ बंधाऱ्यांमध्ये ४६ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. पावसाचा अभाव आणि पाणीसाठ्यातील न झालेली वाढ मराठवाड्याची चिंता वाढवीत आहे.

चार मोठे प्रकल्प मृत साठ्यातच

मराठवाड्यातील एकूण ११ मोठ्या प्रकल्पांपैकी चार प्रकल्प अजूनही मृतसाठ्यातच आहेत. त्यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील सिद्धेश्‍वर, बीडमधील माजलगाव व मांजरा तर धाराशिवमधील सीना कोळेगाव या प्रकल्पाचा समावेश आहे.

जायकवाडी सारखा सर्वांत मोठा असलेल्या प्रकल्पातही केवळ ४ टक्के उपयुक्त पाणी शिल्लक असून निम्न दुधना ५ टक्के, निम्न तेरणा प्रकल्पात १६ टक्के, विष्णुपुरीत ४५ टक्के, निम्न मनार प्रकल्पात २६ टक्के, येलदरीत ३० टक्के उपयुक्त पाणी शिल्लक आहे.

Water Storage
Ujani Dam water storage : उजनी धरणाचा पाणीसाठा अद्याप मायनस; नगर, पुणे, सोलापूर जिल्ह्याचे भवितव्य ठरणार

मध्यम प्रकल्पांची अवस्था बिकट

छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील १६ जालन्यातील सात मध्यम प्रकल्पांत केवळ तीन टक्के उपयुक्त पाणी शिल्लक असून, धाराशिव मधील १७ मध्यम प्रकल्पात सहा टक्के बीडमधील १६ प्रकल्पांत ९ टक्के, लातूरमधील आठ प्रकल्पात ११ टक्के, नांदेडमधील ९ प्रकल्पांत १७ टक्के तर परभणीतील २ मध्यम प्रकल्पांत ७ टक्केच उपयुक्त पाणी शिल्लक आहे. २०२३ मध्ये आज अखेर सर्व मध्यम प्रकल्पात १७ टक्के उपयुक्त पाणी होते. आजच्या घडीला ते केवळ आठ टक्क्यांवर आले आहे.

लघू प्रकल्प चिंताजनक अवस्थेत

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ९८ लघू प्रकल्पात केवळ चार टक्के उपयुक्त पाणी शिल्लक आहे. बीडमधील १२६ प्रकल्पात ५ टक्के, लातूरमधील १३४ प्रकल्पात ९ टक्के, हिंगोलीतील २७ प्रकल्पात ६ टक्के,परभणीतील २२ प्रकल्पात ५ टक्के, नांदेडमधील ८० प्रकल्पात १६ टक्के, धाराशिवमधील २०६ प्रकल्पात १६ टक्के तर जालन्यातील ५७ लघू प्रकल्पात केवळ एक टक्का उपयुक्त पाणी शिल्लक आहे. २०२२ मध्ये आज अखेर लघू प्रकल्पात मध्ये ३४ टक्के तर २०२३ मध्ये नऊ टक्केच उपयुक्त पाणी शिल्लक होते.

Water Storage
Water Storage : मराठवाड्यात वाढेना पाणीसाठा

९० लघू- मध्यम प्रकल्प कोरडे

मराठवाड्यातील ७५० लघू प्रकल्पांपैकी ८५, तर ७५ मध्यम प्रकल्पांपैकी पाच प्रकल्प कोरडे पडले आहेत. कोरड्या पडलेल्या पाच मध्यम प्रकल्पांत जालना, धाराशिव व परभणीतील प्रत्येकी एक तर बीडमधील दोन मध्यम प्रकल्पांचा समावेश आहे. याशिवाय छत्रपती संभाजीनगरमधील ११, धाराशिवमधील १०, बीडमधील ८, जालन्यातील ५, लातूरमधील ३, नांदेड, परभणीमधील प्रत्येकी १ मिळून ३९ मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे.

कोरड्या पडलेल्या ८५ लघू प्रकल्पात परभणीतील १३, धाराशिवमधील ११, लातूरमधील ३, बीडमधील २७ ,जालन्यातील १३ व छत्रपती संभाजीनगरमधील १८ लघू प्रकल्पांचा समावेश आहे. याशिवाय जोत्याखाली पाणीसाठा केलेल्या ३५६ लघू प्रकल्पांत छत्रपती संभाजीनगरमधील ३६, जालन्यातील ३९, बीडमधील ६६, लातूरमधील ८३, धाराशिवमधील ८२, नांदेडमधील २७, परभणीतील ८ व हिंगोलीतील १५ लघू प्रकल्पांचा समावेश आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com