Sharad Pawar : एमपीएससी-यूपीएससी, सारथी, बार्टी, कंत्राटी नोकर भरती अन् भ्रष्टाचारावरून शरद पवार यांचा सरकारला टोला

Sharad Pawar Communicate with students : शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकांच्या रणधुमाळीत स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी पवार यांनी, विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर थेट उत्तर देताना राज्यातील शिंदे सरकारसह केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली आहे.
Sharad Pawar
Sharad PawarAgrowon

Pune News : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातील शिंदे सरकारसह मोदी सरकारवर टीका केली आहे. बेरोजगारी, एमपीएसची-यूपीएससीच्या तारखा, बार्टी, सारथी आणि कंत्राटी नोकर भरतीवरून पवार यांनी ही टीका केली आहे. पवार हे पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात शनिवारी (ता. ०६) स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना बोलत होते.

देशात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरूवात झाली आहे. सत्ताधाऱ्यांवर विरोधकांकाडून सर्वसामान्यांच्या गाठीभेटी घेणे सुरू झाले आहे. यादरम्यान पवार यांनी, एमपीएसची-यूपीएससी परिक्षेच्या तारखा पुढे ढकलण्याआधी निवडणूक आयोगाने शहाणपणाने निवडणुकांचा कार्यक्रम आखायला हवा होता, असे म्हटले आहे.

Sharad Pawar
Sharad Pawar : 'मोदी सरकारला शेतकऱ्यांची चिंता नाही'; शेतकरी मेळाव्यातून शरद पवार यांची टीका

तसेच राज्यसेवेचा जागा वाढवताना, फी कमी करावी, कंत्राटी नोकरी पद भरती बंद व्हायला हवी, असेही पवार यांनी म्हटले आहे. याचबरोबर राज्यात तरूणांच्या हाताला रोजगार देण्यासाठी उद्योग कारखानदारी वाढवली पाहीजे, असेही मत व्यक्त पवार यांनी केले आहे. याचबरोबर कोठे अडचण असले तर तो प्रश्न सामंजस्यांने सोडवायला हवा. मी विद्यार्थ्यांच्या बरोबर असल्याचेही पवार यांनी म्हटले आहे.Sharad Pawar

Sharad Pawar
Sharad Pawar NCP : शरद पवार गटाला ‘सुप्रीम’ दिलासा! निवडणुकीत तुतारीच घुमणार

या कार्यक्रमात स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्यांनी आपल्या व्यथा पवार यांना सांगितल्या. तसेच लोकसभेच्या निवडणुकीच्या कारणाने एमपीएससी आणि यूपीएससीने परीक्षेच्या तारखा पुढे ढकलल्या. यावरून पवार यांनी, स्पर्धा परिक्षेचा अभ्यास विद्यार्थी दोन दोन वर्ष करतात. अशातच परिक्षेचा ठरलेला दिवस बदलला तर सर्व विद्यार्थ्यांचा खर्च वाढतो, वाया जातो, नैराश्य येतं. यामुळे निवडणूक आयोगाने शहाणपणाने तारखा निश्चित करणे गरजेचे असल्याचे पवार म्हणाले.

तर एमपीएससीने घेतलेल्या कमी वेळेतील शारीरिक चाचणीवरून विद्यार्थ्यांत रोष आहे. यावरून पवार यांनी, याआधी विद्यार्थ्यांनी यावरून आंदोलन केले होते. मात्र सरकारी यंत्रणांना शहाणपणा आलेला नाही. परीक्षा रद्द केल्या जातात. त्या परत घेतल्या जातात. यामुळे सतर्क यंत्रणा तयार करणे गरजेचे आहे. निवडणूक संपली की यंत्रणा उभी करू, असे आश्वासन पवारांनी विद्यार्थ्यांना दिले आहे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com