Sharad Pawar : 'मोदी सरकारला शेतकऱ्यांची चिंता नाही'; शेतकरी मेळाव्यातून शरद पवार यांची टीका

Indapur Mahavikas Aaghadi Sabha : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा प्रचार सुरू झाला असून शनिवार (ता.२३) इंदापूरमध्ये महाविकास आघाडीचा शेतकरी मेळावा पार पडला. यावेळी खासदार शरद पवार आणि खासदार संजय राऊत यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
Sharad Pawar : 'मोदी सरकारला शेतकऱ्यांची चिंता नाही'; शेतकरी मेळाव्यातून शरद पवार यांची टीका

Pune News : लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराचा धूरळा उडण्यास सुरूवात झाली आहे. तर महायुतीबरोबरच महाविकास आघाडीच्या प्रचार सभा सुरू झाल्या आहेत. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने बारामती मतदार संघात खासदार सुप्रिया सुळेंसाठी प्रचार सभांचे आयोजन करण्यात आले होते. शनिवार (ता. २३) इंदापूरमध्ये पार पडलेल्या प्रचार सभेत खासदार शरद पवार आणि उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. यावेळी शरद पवार यांनी, केंद्र सरकारवर निशाणा साधताना, 'सध्या देशात वेगळी स्थिती निर्माण झाली असून या सरकारला शेतकऱ्यांची चिंता नाही', असे म्हटले आहे. या शेतकरी मेळाव्याला खासदार सुप्रिया सुळे, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात उपस्थित होते.

शरद पवार म्हणाले, 'सध्या देशात वेगळी स्थिती पाहायला मिळत आहे. देशाची सत्ता आणि कारभार एकाच हातात गेली आहे. यामुळे देशाचा कारभार कोणाच्या हातात जावा, असा प्रश्न सामान्यांना पडला आहे. यामुळेच यंदाची लोकसभा निवडणूक फार महत्वाची आहे'.

Sharad Pawar : 'मोदी सरकारला शेतकऱ्यांची चिंता नाही'; शेतकरी मेळाव्यातून शरद पवार यांची टीका
Sharad Pawar NCP : शरद पवार गटाला ‘सुप्रीम’ दिलासा! निवडणुकीत तुतारीच घुमणार

'पंतप्रधान मोदी आणि मोदी सरकारने शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना अनेक आश्वासने दिली. मात्र याचा मोदी सरकारला विसर पडला आहे. या सरकरला शेतकऱ्यांची कोणतीच चिंता नाही', असा टोला शरद पवार यांनी केंद्र सरकारला लगावला आहे. 

'भाजप देशाचे संविधान बदलण्यास निघाले असून त्यांचा कर्नाटकातील एक मंत्री संविधान बदलण्यासाठी मतदान करा, असे आवाहन मतदारांना करत आहे. भाजप हातात असणाऱ्या सत्तेचा वापर लोकांच्या हितासाठी नाही तर संविधानावर हल्ला करण्यासाठी करत आहे. यामुळे या देशातील सर्वसामान्याने आता जागरूक राहायला हवं', असेही शरद पवार म्हणाले. 

'संजय राऊत यांना देखील तुरूंगात टाकले होते. तर आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना तुरुंगात टाकले आहे. पण जनताच केजरीवाल यांच्या मागे', असल्याचेही शरद पवार यांनी म्हटले आहे. 

Sharad Pawar : 'मोदी सरकारला शेतकऱ्यांची चिंता नाही'; शेतकरी मेळाव्यातून शरद पवार यांची टीका
Sharad Pawar : शेतकऱ्यांच्या दुप्पट उत्पन्नाच्या गॅरेंटीचे काय?

यावेळी संजय राऊत यांनी देखील भाजपवर टीका करताना, 'कांद्याला भाव दिला जात नाही. पण गद्दारांना भाव दिला जातो.  मोदी यांनी २०१४ मध्ये म्हटले होते की, शेतकऱ्यांचे दुप्पट उत्पादन करू, अच्छे दिन आणू. पण आम्हाला असे अच्छे दिन नको आहेत. तुम्ही आम्हाला २०१४ पूर्वीचे अच्छे दिन परत करा. ही लढाई त्यासाठी आहे.  आमच्या महायुतीचा लढा हा यासाठी सुरू असल्याचे म्हटले आहे.

तसेच 'ही लढाई अर्ध्यात काही जन सोडून गेलेत. पण यामुळे आमचा प्रवास थांबलेला नाही. तर अजित पवार गेल्याने काहीच फरक पडला नाही. एकनाथ शिंदे गेल्याने शिवसेना अधिक मजबूत झाली. तर अशोक चव्हाण गेल्याने देखील आदर्श टॉवर खाली आला नाही तर तो आहे तेथेच असल्याची टीका देखील संजय राऊत यांनी केली आहे.    

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com