
Pune/ Solapur News : सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस मतदारसंघातील मारकडवाडी ग्रामस्थांनी ईव्हीएमवर संशय घेतला होता. तसेच ग्रामस्थांनी बॅलेट पेपरवर फेरमतदान घेण्याचा निर्णय घेतला होता. पण प्रशासनाने त्याला विरोध करत जमावबंदी आदेश लागू केला. तसेच २०० हून ग्रामस्थांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. यानंतर आता हे प्रकरण चांगलेच तापले असून मारकडवाडी ग्रामस्थांना महाविकास आघाडीने बळ देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार आणि काँग्रेस नेते तथा लोकसभा विरोधी पक्षनेते राहूल गांधी मारकडवाडीला भेट देणार आहेत.
राज्यात यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ईव्हीएममध्ये फेरफार झाल्याचा संशय अनेक ठिकाणी व्यक्त करण्यात आला. याबाबत राजकीय नेत्यांनी देखील आक्षेफ घेतला होता. तर मारकडवाडी येथे ईव्हीएम विरोधात ठिणगी पडली.
आता याचे पडसाद देशभर उमटण्याची शक्यता असून राज्यात निवडणुक आयोगाने बॅलेट पेपरवर फेर मतदान घेण्याचे आदेश द्यावा, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे. तर तसा आदेश आयोगाने नाही काढला तर सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावू. यातूनही काहीच झाले नाही तर थेट मारकडवाडीतून लाँग मार्च काढू, असा इशाराही राहुल गांधी यांनी दिला आहे.
नवनियुक्त आमदार उत्तम जानकर यांच्यासह ग्रामस्थांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. यावरून देखील जानकर यांनी आमच्या न्याय हक्कासाठी आता लाँग मार्च काढू अशी माहिती दिली आहे. तर याला काँग्रेस नेते राहुल गांधी पांठिबा दिल्याचे सांगितले आहे. दरम्यान शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील समाजमाध्यमावर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे.
आव्हाड यांनी, मारकडवाडीत बॅलेट पेपरवर मतदानाची मागणी करणाऱ्या आणि यासाठी पुढाकार घेणाऱ्या १७ जणांसर अनेक ग्रामस्थांवर प्रशासनाने गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांची ही कृती ईव्हीएमविरोधातील राज्याभर असणाऱ्या खदखदीला चालणा देणारी आहे.
यामुळे आता राज्यभर मारकडवाडी पॅटर्न रावला जाणार आहे. यासाठी आता शरद पवार रविवारी (ता.८) मारकडवाडीला भेट देतील. यानंतर राहुल गांधीही मारकडवाडीला जाणार आहेत. येथूनच ईव्हीएमविरोधात लाँग मार्च काढला जाणार आहे. लोकशाहीला मारक ठरणाऱ्या ईव्हीएमविरोधातील ठिणगी देशभर पसरो. क्रांतीचा एल्गार होवो!, असे आव्हाड यांनी म्हटले आहे.
आम्ही राष्ट्रद्रोह केला का? : जानकर
माळशिरस तालुक्यात फक्त मारकडवाडी ग्रामस्थांना ईव्हीएमवर संशय आहे असे नाही. तर तालुक्यातील ९१ गावांतील ग्रामस्थांना देखील आक्षेप आहे. या ग्रामस्थांचा ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर मतदान व्हावे, अशी मागणी आहे. याबाबतच ग्रामस्थांना आक्रोश असल्याचा दावा आमदार उत्तम जानकर यांनी केला आहे. तर आजपर्यंत मारकडवाडी माझ्या पेक्षा इतर कोणत्याच उमेदवाराला अधिक मते मिळालेली नाहीत.
पण यंदा विरोधी उमेदावाला अधिक मते मिळाली आहेत. यावरच ग्रामस्थांचा विरोध आहे. भाजपला मते डायवर्ट झाल्याचा अक्षेप ग्रामस्थांचा आहे. यावरूनच बॅलेट पेपरवर फेरमतदान घेण्याचा निर्णय ग्रामस्थांचा होता. पण मारकडवाडीत प्रशासनाने पोलीस फोर्स, सीआरपीएफच्या ३ तुकड्या तैनात करत दडपशाही केली. आमच्यावर गुन्हे दाखल केले. आम्ही काय राष्ट्रद्रोह केला होता काय? असा सवाल जानकर यांनी उपस्थित केला आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.