
Nashik News : जिल्ह्यात खरीप हंगामास सुरुवात झाली असून, शेतकऱ्यांकडून बियाणे खरेदी करण्यात येत आहे. मात्र काही विक्रेते बियाणे विक्री करताना दरापेक्षा जास्त रक्कम आकारात असल्याच्या तक्रारी आहेत. या पार्श्वभूमीवर कृषी विभाग सावध झाला आहे.
बियाणे ‘एमआरपी’पेक्षा जास्त भावाने विक्री केल्यास कारवाईची तयारी केली आहे. बियाणे खरेदी करत असताना विक्रेत्याकडून पक्क्या बिलाची मागणी करावी व त्या बिलाप्रमानेच रक्कम अदा करावी. बियाणे खरेदी बिल पावती जपून ठेवावी.
जो कोणी बियाणे विक्रेता एमआरपीपेक्षा जास्त किमतीत बियाणे विक्री करीत असेल तसेच पक्के बिल देत नसेल त्याची तक्रार तालुका स्तरावर तालुका कृषी अधिकारी व कृषी अधिकारी पंचायत समिती तसेच जिल्हास्तरावर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय नाशिक, कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद नाशिक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
तक्रार निवारण कक्ष व्हॉट्सअॅप क्रमांक (७८२१०३२४०८) यावर संदेश पाठवावा असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अभिमन्यू काशीद यांनी केले आहे. याबाबत माहितीसाठी जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी संजय शेवाळे (मो.९४२२२२४४५१), मोहीम अधिकारी दीपक सोमवंशी (मो.९९७५४३४४१८), जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक डॉ. जगन सूर्यवंशी (मो.९४०३५४६३३८) यांच्याशी संपर्क साधावा.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.