
Sangli News : येथील कृषी बाजार समितीच्या डाळिंब पॅक हाऊसच्या कामांचा प्रारंभ आणि शुद्धिकरण पाणी प्रकल्पाचे लोकार्पण जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील, तहसीलदार सागर ढवळे, मुख्याधिकारी वैभव हजारे यांच्या हस्ते झाले.
आटपाडी बाजार समितीच्या आवारात डाळिंब सौदे आठवड्यातील सहा दिवस होतात. तसेच दर शनिवारी पश्चिम महाराष्ट्रातील सर्वांत मोठा शेळ्या-मेंढ्यांचा बाजार भरतो. सौदे बाजारात खरेदी केलेल्या डाळिंबाची प्रतवारी करण्यासाठी व्यापाऱ्यांना पॅक हाऊसची गरज होती. गेल्या वर्षी २०० टन क्षमतेचे पॅक हाऊस उभारले होते.
तेही अपुरे पडत असल्यामुळे दुसऱ्या पॅक हाऊसची गरज होती. तसेच डाळिंब सौदे बाजारासाठी येणारे शेतकरी व्यापारी आणि शेळ्या-मेंढ्यांच्या बाजारात येणारे शेतकरी, व्यापाऱ्यांना शुद्ध, थंड पिण्याच्या पाण्याची आवश्यकता होती. हे पाणी देण्याची शेतकऱ्यांनी बाजार समितीकडे मागणी केली होती.
त्यामुळे सभापती संतोष पुजारी आणि संचालक मंडळाने शुध्द, थंड पिण्याच्या पाण्याचा प्रकल्प उभारला होता. त्याचे लोकार्पण आणि नवीन डाळिंब पॅक हाऊसच्या कामाचा प्रारंभ जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील, तहसीलदार सागर ढवळे, मुख्याधिकारी वैभव हजारे यांच्या हस्ते आज केले.
शेळ्या-मेंढ्यांच्या आठवडा बाजारात थंड पाण्याचे जार ठेवले जाणार आहेत. पॅक हाऊसमुळे व्यापाऱ्यांची गैरसोय दूर होणार आहे. यावेळी सभापती संतोष पुजारी, जयदीप भोसले, उपसभापती सुनील सरक, संचालक राहुल गायकवाड, साहेबराव पाटील, दादासाहेब सरगर, शशिकांत जाधव उपस्थित होते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.