Sugarcane Harvest Season In Marathwada : मराठवाड्यातील ६३ पैकी ४१ कारखान्यांचा हंगाम आटोपला

मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील ६३ पैकी ४१ साखर कारखान्यांचा ऊस गाळप हंगाम आटोपला आहे.
Sugarcane Season
Sugarcane SeasonAgrowon

Chhatrapati Sambhajinagar : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील ६३ पैकी ४१ साखर कारखान्यांचा ऊस गाळप हंगाम (Sugarcane Season) आटोपला आहे.

२७ मार्च अखेरपर्यंत गाळपात सहभागी कारखान्यांनी २ कोटी ३९ लाख ४४ हजार ४९६ टन ऊस गाळपातून २ कोटी २७ लाख ३४४ क्विंटल साखरेचे उत्पादन केल्याची माहिती साखर विभागाच्या सूत्रांनी दिली.

मराठवाड्यातील अनेक साखर कारखान्यांचा ऊस गाळप हंगाम सध्या अंतिमतेकडे वाटचाल करताना दिसतो आहे. यंदाच्या ऊस गाळप हंगामात सहभागी झालेल्या ६३ कारखान्यात छत्रपती संभाजीनगर, परभणी या दोन जिल्ह्यातील प्रत्येकी ७, हिंगोली व जालना जिल्ह्यातील प्रत्येकी ५, बीडमधील ८, नांदेडमधील ६, लातूरमधील १२ व धाराशिवमधील १३ साखर कारखान्यांचा समावेश आहे.

२७ मार्च अखेरपर्यंत गाळपात सहभागी या कारखान्यांनी केलेल्या साखर उत्पादनात जवळपास पाच जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा सरासरी साखर उतारा १० टक्क्यांपेक्षा पुढे राहिला आहे.

Sugarcane Season
Sugarcane FRP : ‘एफआरपी’ थकविणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करा

यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, नांदेड व लातूर या जिल्ह्यांतील कारखान्यांचा समावेश आहे. धाराशिव व परभणी जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा सरासरी साखर उतारा हा अनुक्रमे ८.९७ व ९.७४ टक्के राहिला आहे.

तर बीड जिल्ह्यातील कारखान्यांचा सरासरी साखर उतारा मराठवाड्यात सर्वात कमी म्हणजे ७.४७ टक्के इतकाच राहिल्याची माहिती साखर विभागाच्या सूत्रांनी दिली.

जिल्हानिहाय हंगाम आटोपलेले कारखाने संख्या

छत्रपती संभाजीनगर - ४

जालना - १

बीड - २

परभणी- ६

हिंगोली - ५

नांदेड - ६

लातूर - ७

धाराशिव - १०

Sugarcane Season
Sugar Mill Pending FRP : ‘एफआरपी’ थकविणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करा

जिल्हानिहाय ऊस गाळप( टनामध्ये) व साखर उत्पादन (क्विंटलमध्ये)

जिल्हा - ऊस गाळप- साखर उत्पादन

छ. संभाजीनगर- २०४५९९८ - २१७७८६१

जालना - २३१७९०२ - २३९२४२०

बीड- ४१४०१७३ - ३०९१३०५

परभणी - २८८९२३१ - २८७१६८०

हिंगोली - १५५६५५० - १६४२०२५

नांदेड - १७७४४४१- १७७७६२०

लातूर - ४२८५३७५ - ४३२०४८६

धाराशिव - ४९३४८२६ - ४४२६९४७

हिंगोली, नांदेड जिल्ह्यातील ऊस गाळप पूर्ण

मराठवाड्यातील निम्म्यापेक्षा जास्त कारखान्यांचा ऊस गाळप हंगाम आटोपला आहे. त्यापैकी हिंगोली, नांदेड जिल्ह्यातील सर्वच कारखान्यांचा ऊस गाळप हंगाम आटोपला असून धाराशिवमधील १३ पैकी १०, लातूरमधील १२ पैकी ७, छत्रपती संभाजीनगरमधील ७ पैकी ४, बीडमधील ८ पैकी २, जालन्यातील ५ पैकी १ कारखान्याचा ऊस गाळप हंगाम २७ मार्च पूर्वी आटोपला होता.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com