Water Storage : सातपुड्यातील सिंचन प्रकल्पांत साठा स्थिर

Satpuda Water Stock : खानदेशात सातपुडा पर्वतातील व पर्वतालगतचे अनेक प्रकल्प यंदा भरल्याने जलसाठे मुबलक आहेत. लघु प्रकल्प, तलाव भरले होते.
Kumbhi Water Project
Water Storage Agrowon
Published on
Updated on

Jalgaon News : खानदेशात सातपुडा पर्वतातील व पर्वतालगतचे अनेक प्रकल्प यंदा भरल्याने जलसाठे मुबलक आहेत. लघु प्रकल्प, तलाव भरले होते. सातपुड्यात टंचाई कमी आहे. वन्यप्राण्यांसह आदिवासी पाड्यांवर टंचाईचा सामना करावा लागणार नाही, अशी स्थिती आहे.

सातपुड्यात पाऊसमान बरे होते. रावेरात अतिवृष्टीचा प्रकारही सातपुड्यात झाला होता. जुलै, ऑगस्ट २०२४ मध्येच यावल, चोपडा, रावेर, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारमधील तळोदा, शहादा, अक्कलकुवा भागात सातपुड्यातील मध्यम प्रकल्प १०० टक्के भरले होते.

त्यात रावेरातील अभोडा, मंगरूळ, सुकी, यावलमधील मोर, निंबादेवी, चोपड्यातील गूळ, शहाद्यातील सुसरी, चिरडे, दरा आदी लघू व मध्यम प्रकल्पांचा समावेश होता. तसेच चोपड्यातील गूळ प्रकल्प, चिंचपाणी, डुकरणे, चांदण्या तलाव आदी प्रकल्पांतही बऱ्यापैकी जलसाठा होता. चोपड्यातील डुकरणे, चिंचपाणी व चांदण्या तलावात जलसाठा आहे.

प्रकल्पांत आता जलसाठा घटत आहे. परंतु स्थिती आटोक्यात आहे. सातपुड्यातील जीवसृष्टीला फारसा फटका बसणार नाही, अशी स्थिती आहे. अनेक वन्यप्राणी पाण्यासाठी गावोगावी, सपाटी भागावर येत आहेत. त्यात माकड, रानडुकरे, हरीण व अन्य प्राणी सपाटी भागात दाखल झाले आहेत.

वन्यप्राण्यांच्या पाण्यासाठी काही भागात किंवा यावल अभयारण्य, कुऱ्हा वढोदा परिसरात कृत्रीम तलाव वन विभागाने तयार केले आहेत. परंतु ते अपुरे पडू शकतात. कारण पुढे पाण्याची गरज अधिक राहील. उष्णतेते ते लागलीच आटतात. त्यात २४ तास पाणी नसते. यामुळे वन्यप्राणी शेतशिवारात दाखल होत असून, पिकांची नासाडीदेखील होत आहे.

Kumbhi Water Project
Marathwada Water Storage : मराठवाड्यातील ७५ प्रकल्पांत उपयुक्त साठा निम्म्यावर

सध्या यावल, रावेर, चोपडा, शिरपूर, शहादा, तळोदा, अक्कलकुवा या तालुक्यांत सातपुडालगत रानडुकरे, हरीण, गवे, निलगायी धूमाकूळ घालत आहेत. केळी, ऊस, भाजीपाला पिकांची नासधूस करीत आहेत.

Kumbhi Water Project
Water Crisis : वसई-विरारमधील गावे पाण्यावाचून तहानलेली

यामुळे शेतकऱ्यांना शेतात मुक्कामी थांबावे लागत आहे. अनेक शेतकऱ्यांनी कापूस लागवडीची तयारी केली आहे. परंतु कापसाचे पीक हरीण व अन्य वन्यप्राणी फस्त करीत असल्याने शेतकऱ्यांची अडचण झाली आहे. शेतात मुक्कामी थांबल्याशिवाय पर्याय नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

कमाल प्रकल्पांत मुबलक जलसाठा

सातपुड्यातील कमाल सिंचन प्रकल्पांत मुबलक जलसाठा आहे. हा जलसाठा घटत आहे. पण पुढे टंचाई वाढेल, असे दिसत नाही. पाऊसमान जेथे चांगले होते, तेथे काही प्रमाणात कृत्रीम टंचाई आहे. कारण पाणी साठवणीची व्यवस्था पुरेशी नाही. पाऊस आला व वाहून गेला, अशी स्थिती अनेक भागात आहे. याचा फटका मात्र बसू शकतो. आदिवासी पाड्यांत विंधन विहिरींची गरज अधिक आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com